शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

High Court on Extra Marital Affaire: खबरदार! जोडीदाराच्या चारित्र्यावर खोटे आरोप लावाल तर; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 08:55 IST

2014 साली लग्न झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते. 2017 मध्ये, पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला, जो 2019 मध्ये मंजूर झाला. ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका आणि तिचा पती हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले गेले. 

जोडीदारावर चारित्र्यहीनतेच्या आरोपांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. नात्यातील विवाहबाह्य संबंधाचे आरोप गंभीर असतात, ते गांभीर्यानेच घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. विवाह हे पवित्र नाते असून निरोगी समाजासाठी त्याची शुद्धता राखणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे. 

न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने एका महिलेचे अपील फेटाळताना आपल्या निकालात ही निरीक्षणे नोंदवली. पतीने महिलेच्या क्रूरतेवरून कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. महिला पतीच्या चारित्र्यावर संशय घेत होती, यामुळे न्यायालयाने त्यांना घटस्फोट दिला होता. याविरोधात महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात अपिल केले होते. 

2014 साली लग्न झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते. 2017 मध्ये, पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला, जो 2019 मध्ये मंजूर झाला. ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका आणि तिचा पती हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले गेले. 

या प्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले की, अपिल करणाऱ्या महिलेने पतीवर गंभीर आरोप लावले आहेत. मात्र, सुनावणीवेळी यातील एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. सासऱ्याविरोधात देखील जो गंभीर आरोप केलेला तो देखील सिद्ध झाला नाही. लग्न हे एक पवित्र नाते आहे, त्याची शुद्धता ठेवण्याची गरज आहे, अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही क्रूरता आहे. यामुळे कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयामध्ये दखल देण्याचे आम्हाला काहीही कारण दिसत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. 

पती आणि त्याच्या वडिलांवर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे त्यांच्या चारित्र्याची हत्या आहे, जे पतीवरील मानसिक क्रूरता दर्शवते. पती-पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप हे त्याचे चारित्र्य, दर्जा, प्रतिष्ठा आणि आरोग्यावर गंभीर आघात असल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे. यामुळे मानसिक यातना आणि त्रास होतात आणि ते क्रूरतेसारखे आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्न