शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

S. Jaishankar: “१९४७ मध्ये विभाजन झाले नसते, तर भारत सर्वांत मोठा देश बनला असता”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 08:48 IST

S. Jaishankar: भारत असा देश आहे जो सुरक्षेच्याबाबतीत कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S. Jaishankar: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद आणि चीन सीमेवर झालेल्या झटापटीला जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले. यावरून भारत आता कोणाच्या दबावात न येता, आपल्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वकाही करू शकतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत असा देश आहे जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. १९४७ साली फाळणी झाली नसती तर चीन नव्हे तर भारत हा जगातील सर्वांत मोठा देश झाला असता. फाळणीमुळे देशातील अनेक प्रदेश वेगळे झाले, असे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री म्हणून अन्य देशांमध्ये गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की, कोरोना काळातील देशाच्या कामगिरीची जगाने दखल घेतली आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले आहे. 

जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा

जयशंकर पुढे म्हणाले की, अन्य देशातील माझ्या समकक्षांनी सांगितले की, त्यांच्या काही समस्या आहेत, ज्यावर पंतप्रधान मोदी तंत्रज्ञानाद्वारे तोडगा काढू शकतात, असा त्यांना विश्वास आहे. जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा आहे. कारण प्रादेशिक संकटाला प्रतिसाद देणारा देश नेहमीच पहिला असतो. जागतिक सुरक्षेतही भारताला महत्त्व आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर