शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

S. Jaishankar: “१९४७ मध्ये विभाजन झाले नसते, तर भारत सर्वांत मोठा देश बनला असता”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 08:48 IST

S. Jaishankar: भारत असा देश आहे जो सुरक्षेच्याबाबतीत कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S. Jaishankar: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद आणि चीन सीमेवर झालेल्या झटापटीला जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले. यावरून भारत आता कोणाच्या दबावात न येता, आपल्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वकाही करू शकतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत असा देश आहे जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. १९४७ साली फाळणी झाली नसती तर चीन नव्हे तर भारत हा जगातील सर्वांत मोठा देश झाला असता. फाळणीमुळे देशातील अनेक प्रदेश वेगळे झाले, असे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री म्हणून अन्य देशांमध्ये गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की, कोरोना काळातील देशाच्या कामगिरीची जगाने दखल घेतली आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले आहे. 

जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा

जयशंकर पुढे म्हणाले की, अन्य देशातील माझ्या समकक्षांनी सांगितले की, त्यांच्या काही समस्या आहेत, ज्यावर पंतप्रधान मोदी तंत्रज्ञानाद्वारे तोडगा काढू शकतात, असा त्यांना विश्वास आहे. जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा आहे. कारण प्रादेशिक संकटाला प्रतिसाद देणारा देश नेहमीच पहिला असतो. जागतिक सुरक्षेतही भारताला महत्त्व आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर