शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

S. Jaishankar: “१९४७ मध्ये विभाजन झाले नसते, तर भारत सर्वांत मोठा देश बनला असता”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 08:48 IST

S. Jaishankar: भारत असा देश आहे जो सुरक्षेच्याबाबतीत कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S. Jaishankar: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद आणि चीन सीमेवर झालेल्या झटापटीला जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले. यावरून भारत आता कोणाच्या दबावात न येता, आपल्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वकाही करू शकतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत असा देश आहे जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. १९४७ साली फाळणी झाली नसती तर चीन नव्हे तर भारत हा जगातील सर्वांत मोठा देश झाला असता. फाळणीमुळे देशातील अनेक प्रदेश वेगळे झाले, असे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री म्हणून अन्य देशांमध्ये गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की, कोरोना काळातील देशाच्या कामगिरीची जगाने दखल घेतली आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले आहे. 

जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा

जयशंकर पुढे म्हणाले की, अन्य देशातील माझ्या समकक्षांनी सांगितले की, त्यांच्या काही समस्या आहेत, ज्यावर पंतप्रधान मोदी तंत्रज्ञानाद्वारे तोडगा काढू शकतात, असा त्यांना विश्वास आहे. जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा आहे. कारण प्रादेशिक संकटाला प्रतिसाद देणारा देश नेहमीच पहिला असतो. जागतिक सुरक्षेतही भारताला महत्त्व आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर