शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ?; हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:56 IST

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो.

हरिश गुप्तानवी दिल्ली : देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मोदी सरकार तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. आणखी तीन महिन्यांसाठी ही योजना वाढविल्यास ५६४०० कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे. या योजनेचा एक वर्षाचा खर्च २,२७,८४१ कोटी रुपये असेल, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. 

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि भू-राजकीय स्थिती खाली आणण्यासाठी केंद्र सरकारवर आधीच आर्थिक दबाव आलेला आहे. तथापि, हिमाचल प्रदेश (नोव्हेंबर) आणि गुजरात (डिसेंबर) विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच किमान डिसेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ द्यावी, असे भाजप नेतृत्वाला वाटते. ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचणारी योजना बंद केल्याने दोन राज्यांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे नेत्यांचे मत आहे. 

पंतप्रधान घेणार अंतिम निर्णयएससीओ परिषदेवरून परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेबाबत राजकीय दृष्टिकोनातून अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. अन्नधान्य, उर्वरके व स्वयंपाकाच्या गॅसवरील सरकारचे सबसिडी बिल आधीच चिंताजनक स्थितीत वाढले आहे. वित्त मंत्रालयातील व्यय विभाग वाढत्या वित्तीय तुटीमुळे मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ देण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे सबसिडी बिल कमी करण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देताना काही अटी घातल्या जातील, अशी शक्यता आहे. प्रत्येक तिमाहीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महसुली वसुलीच्या वाढीमुळे सरकारचे काम आणखी सोपे होऊ शकते.