शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्झिट पोल’ने साधला समतोल! पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:55 IST

बहुतांश निष्कर्ष ठरले खरे, पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला

ठळक मुद्देकोरोनाचे सावट देशावर अधिक गडद झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीने बंगाल निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपताच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये (एक्झिट पोल) अनेकांनी भाजपला आसामात सत्ता राखता येईल, असे सांगतानाच इतरत्र हा पक्ष मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवला होता. बंगालमध्ये तर भाजपला १०० हून अधिक जागा मिळून सत्तेच्या समीप हा पक्ष जाईल, असेही भाकीत करण्यात आले होते. परंतु निकालात भाजपला ७५ जागांवरच समाधान मानावे लागले.  कोरोनाचे सावट देशावर अधिक गडद झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीने बंगाल निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. भाजपचा प्रचाराचा झंझावात आणि मोदी-शहा यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून झाडून साऱ्या सर्वेक्षण संस्थांनी निष्कर्षांत बंगालात भाजप १०० हून अधिक जागा पटकावेल, असा अंदाज व्यक्त केला होता. 

तामिळनाडूत सत्तेचा लंबक कधी अण्णाद्रमुक तर कधी द्रमुककडे झुकतो. यावेळी जनतेने पसंती द्रमुकला दिली. तामिळनाडूत पाच वर्षांनी सत्तापालट होतो. एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत इथे ठरले. भाजपचे अण्णाद्रमुकशी युती करून दक्षिणेत चंचूप्रवेश करण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. 

मल्याळी जनतेने मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. केरळात सत्तापालट होणार नाही. माकपप्रणीत एलडीएफ पुन्हा विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असल्याचे चित्र आहे. 

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या कारभारावर आसामी जनता खूश असून, त्यांच्याचकडे पुन्हा एकदा सत्तेची दोरी आसामी जनतेने सोपवली आहे. आसामात भाजप सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असला तरी काँग्रेसनेही चांगली लढत दिल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होत आहे. 

पुदुच्चेरीत एन. रंगास्वामी यांच्या स्थानिक काँग्रेस पक्षाशी भाजपने हातमिळवणी केली आहे. त्यात अण्णाद्रमुकचाही समावेश आहे. या आघाडीने पुदुच्चेरीत १५ जागांवर आघाडी घेत सत्तेसाठी दावा केला आहे. काँग्रेस व स्थानिक आघाडीत रस्सीखेच होईल, असा अंदाज पोलमध्ये वर्तविण्यात आला होता.

पश्चिम बंगालमध्ये लागलेल्या निवडणूक प्रत्यक्ष निकालात भाजपला ७५ जागांवरच विजय नोंदवता आला असून, ममतांच्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.    

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक