शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

इच्छाशक्तीअभावी निवडणूक सुधारणा दीर्घकाळ प्रलंबित, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:01 IST

प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.देशातील निवडणूक यंत्रणा व लोकशाही राजवटीचा अभ्यास करून काही विश्लेषक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सनदी अधिकारी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन कुरेशी यांनी केले आहे. या लेखांचे ‘दी ग्रेट मार्च आॅफ डेमॉक्रसी : सेव्हन डिकेड्स आॅफ इंडियाज इलेक्शन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देशातील पहिली लोकसभा निवडणूक, आयोगाचे कार्य तसेच आजवर झालेल्या निवडणुकांचा आढावा या पुस्तकात आहे.मनोगतात कुरेशी यांनी म्हटले आहे की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास अटकाव करणे, निवडणूक आयोगातील नियुक्त्या पारदर्शीपणे होण्यासाठी तसे कायदे करणे, निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणे या गोष्टी अंमलात येणे आवश्यक आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनेक पत्रे लिहिली. पण अद्याप या सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावणाºया न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळेच काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा अमलात आल्या हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.पैशांचा गैरवापर थांबवामाजी राष्ट्रपती व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला पैशाचा व बळाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास लोकशाही आपला आत्मा हरवून बसेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत