शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:43 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यात काहीजण उशिरा पोहोचल्यामुळे त्यांचा जीव वाचले आहेत. केरळमधील एका कुटुंबातील ११ सदस्यांना एका रेस्टॉरंटमध्ये जास्त मीठ असलेले जेवण देण्यात आले. 

कुटुंबाने फ्राईड राईस ऑर्डर केला. यामुळे त्यांना बैसरणला पोहोचण्यास उशीर झाला, यामुळेच त्यांचा जीव वाचला. कन्नूरमध्ये राहणारी लावण्या कपड्यांचा व्यवसाय करते.तिने फेसबुकवर एका व्हिडिओमध्ये पूर्ण घटना शेअर केली आहे.

"दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा

केरळमधील कन्नूर येथील हे कुटुंब १८ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये सुट्टीसाठी निघाले होते. ते १९ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले आणि दोन दिवस गुलमर्ग-सोनमर्गमध्ये फिरले. लावण्या यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या कुटुंबाने श्रीनगरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगामला जाण्याची योजना आखली होती. सकाळी निघायला त्याला थोडा उशीर झाला. लावण्या म्हणाली की, गेली दोन दिवसांत जेवण व्यवस्थित मिळाले नव्हते. म्हणून बैसरणला जाताना तिच्या पतीने जेवण करण्याचा आग्रह धरला. बैसरन रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटपासून फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर होते जिथे ते थांबले होते.

रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस ऑर्डर केला. काही वेळाने आलेल्या ऑर्डरमध्ये जास्त मीठ होते. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना मीठ जास्त असल्याचे समजले. त्यांनी आम्हाला पुन्हा बनवून दिले. यामुळे लावण्यच्या कुटुंबाला सुमारे एक तास वाट पहावी लागली. हा वेळ त्यांच्यासाठी जीव वाचवणारा ठरला. जेवणानंतर ते बर्सनजवळ येताच लोक गडबडीत पळत असल्याचे दिसले, पळापळ सुरू झाली. लोकही ओरडत पळत होते. केरळ कुटुंबाला त्यांची भाषा समजत नव्हती, पण त्यांना नक्कीच कळले की पुढे काहीतरी गडबड आहे.

लवकर परतण्याचा सल्ला दिला

लावण्या आणि तिच्या पतीने एक गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या लोकांनी त्याला सांगितले की केंद्रीय सुरक्षा दल आणि पर्यटकांमध्ये झटापट झाली आहे. लावण्याचा ड्रायव्हरने त्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिला. तिने सांगितले की, आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. बेअर्सनला न जाण्याचा पश्चात्ताप होत असताना, ते एका तलावावर पोहोचले. थोड्याच वेळात, दुपारी ४.३० च्या सुमारास, दुकानदारांनी त्यांची दुकाने लवकर बंद करण्यास सुरुवात केली. परिसरात वाढत्या तणावामुळे त्याने त्यांच्या कुटुंबालाही हा परिसर सोडण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर