शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:43 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यात काहीजण उशिरा पोहोचल्यामुळे त्यांचा जीव वाचले आहेत. केरळमधील एका कुटुंबातील ११ सदस्यांना एका रेस्टॉरंटमध्ये जास्त मीठ असलेले जेवण देण्यात आले. 

कुटुंबाने फ्राईड राईस ऑर्डर केला. यामुळे त्यांना बैसरणला पोहोचण्यास उशीर झाला, यामुळेच त्यांचा जीव वाचला. कन्नूरमध्ये राहणारी लावण्या कपड्यांचा व्यवसाय करते.तिने फेसबुकवर एका व्हिडिओमध्ये पूर्ण घटना शेअर केली आहे.

"दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा

केरळमधील कन्नूर येथील हे कुटुंब १८ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये सुट्टीसाठी निघाले होते. ते १९ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले आणि दोन दिवस गुलमर्ग-सोनमर्गमध्ये फिरले. लावण्या यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या कुटुंबाने श्रीनगरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगामला जाण्याची योजना आखली होती. सकाळी निघायला त्याला थोडा उशीर झाला. लावण्या म्हणाली की, गेली दोन दिवसांत जेवण व्यवस्थित मिळाले नव्हते. म्हणून बैसरणला जाताना तिच्या पतीने जेवण करण्याचा आग्रह धरला. बैसरन रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटपासून फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर होते जिथे ते थांबले होते.

रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस ऑर्डर केला. काही वेळाने आलेल्या ऑर्डरमध्ये जास्त मीठ होते. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना मीठ जास्त असल्याचे समजले. त्यांनी आम्हाला पुन्हा बनवून दिले. यामुळे लावण्यच्या कुटुंबाला सुमारे एक तास वाट पहावी लागली. हा वेळ त्यांच्यासाठी जीव वाचवणारा ठरला. जेवणानंतर ते बर्सनजवळ येताच लोक गडबडीत पळत असल्याचे दिसले, पळापळ सुरू झाली. लोकही ओरडत पळत होते. केरळ कुटुंबाला त्यांची भाषा समजत नव्हती, पण त्यांना नक्कीच कळले की पुढे काहीतरी गडबड आहे.

लवकर परतण्याचा सल्ला दिला

लावण्या आणि तिच्या पतीने एक गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या लोकांनी त्याला सांगितले की केंद्रीय सुरक्षा दल आणि पर्यटकांमध्ये झटापट झाली आहे. लावण्याचा ड्रायव्हरने त्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिला. तिने सांगितले की, आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. बेअर्सनला न जाण्याचा पश्चात्ताप होत असताना, ते एका तलावावर पोहोचले. थोड्याच वेळात, दुपारी ४.३० च्या सुमारास, दुकानदारांनी त्यांची दुकाने लवकर बंद करण्यास सुरुवात केली. परिसरात वाढत्या तणावामुळे त्याने त्यांच्या कुटुंबालाही हा परिसर सोडण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर