शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:43 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यात काहीजण उशिरा पोहोचल्यामुळे त्यांचा जीव वाचले आहेत. केरळमधील एका कुटुंबातील ११ सदस्यांना एका रेस्टॉरंटमध्ये जास्त मीठ असलेले जेवण देण्यात आले. 

कुटुंबाने फ्राईड राईस ऑर्डर केला. यामुळे त्यांना बैसरणला पोहोचण्यास उशीर झाला, यामुळेच त्यांचा जीव वाचला. कन्नूरमध्ये राहणारी लावण्या कपड्यांचा व्यवसाय करते.तिने फेसबुकवर एका व्हिडिओमध्ये पूर्ण घटना शेअर केली आहे.

"दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा

केरळमधील कन्नूर येथील हे कुटुंब १८ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये सुट्टीसाठी निघाले होते. ते १९ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले आणि दोन दिवस गुलमर्ग-सोनमर्गमध्ये फिरले. लावण्या यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या कुटुंबाने श्रीनगरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगामला जाण्याची योजना आखली होती. सकाळी निघायला त्याला थोडा उशीर झाला. लावण्या म्हणाली की, गेली दोन दिवसांत जेवण व्यवस्थित मिळाले नव्हते. म्हणून बैसरणला जाताना तिच्या पतीने जेवण करण्याचा आग्रह धरला. बैसरन रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटपासून फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर होते जिथे ते थांबले होते.

रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस ऑर्डर केला. काही वेळाने आलेल्या ऑर्डरमध्ये जास्त मीठ होते. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना मीठ जास्त असल्याचे समजले. त्यांनी आम्हाला पुन्हा बनवून दिले. यामुळे लावण्यच्या कुटुंबाला सुमारे एक तास वाट पहावी लागली. हा वेळ त्यांच्यासाठी जीव वाचवणारा ठरला. जेवणानंतर ते बर्सनजवळ येताच लोक गडबडीत पळत असल्याचे दिसले, पळापळ सुरू झाली. लोकही ओरडत पळत होते. केरळ कुटुंबाला त्यांची भाषा समजत नव्हती, पण त्यांना नक्कीच कळले की पुढे काहीतरी गडबड आहे.

लवकर परतण्याचा सल्ला दिला

लावण्या आणि तिच्या पतीने एक गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या लोकांनी त्याला सांगितले की केंद्रीय सुरक्षा दल आणि पर्यटकांमध्ये झटापट झाली आहे. लावण्याचा ड्रायव्हरने त्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिला. तिने सांगितले की, आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. बेअर्सनला न जाण्याचा पश्चात्ताप होत असताना, ते एका तलावावर पोहोचले. थोड्याच वेळात, दुपारी ४.३० च्या सुमारास, दुकानदारांनी त्यांची दुकाने लवकर बंद करण्यास सुरुवात केली. परिसरात वाढत्या तणावामुळे त्याने त्यांच्या कुटुंबालाही हा परिसर सोडण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर