शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पाचवी आणि आठवीच्याही होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:39 IST

इयत्ता ५ वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवण्याची मुभा शाळांना देणारी कायदा दुरुस्ती लोकसभेने बुधवारी मंजूर केली.

नवी दिल्ली : इयत्ता ५ वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवण्याची मुभा शाळांना देणारी कायदा दुरुस्ती लोकसभेने बुधवारी मंजूर केली. संसदेने या आधी मंजूर केलेल्या शिक्षण हक्क कायद्यात इयत्ता आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास अनुत्तीर्ण न करण्याची अथवा त्याला शाळेतून काढून न टाकण्याची सक्ती होती. त्यामुळे काही राज्यांमध्ये इयत्ता ५वी व ८वीची वार्षिक परीक्षाच घेतली जात नव्हती किंवा परीक्षा घेतली व त्यात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरी त्यास वरच्या इयत्तेत घेतले जात होते.इयत्ता आठवीपर्यंत कोणालाही अनुत्तीर्ण न करण्याची मूळ कायद्यातील ही सक्ती दूर करण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडले व ते लोकसभेने मंजूर केले. या दोन्ही इयत्तांमध्ये अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने, खालावणारा शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी अशी दुरुस्ती करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली होती, असे जावडेकर म्हणाले.

टॅग्स :examपरीक्षा