शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 12:59 IST

जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली पाहिजे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग येथे ‘सध्या पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा होणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांशीही चर्चा केली पाहिजे कारण त्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात’ असं म्हटलं आहे. तसेच ‘मला वाटतं एका ठराविक वेळेनंतर हुरियत कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांशी चर्चा झालीच पाहिजे’, असं ही म्हटलं आहे. 'आपल्याला यश मिळेल हा विचार करून 2014 च्या निवडणुकांआधी काँग्रेसने अफजल गुरुला फाशी दिली होती. आज भाजपा ही त्याची पुनरावृत्ती करत याहे. त्यांनी कन्हैया, उमर खालिद आणि जम्मू-काश्मीरच्या सात-आठ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे' असं  मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी