शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

'खासगीकरणाच्या नावानं सगळं विकलं चाललंय, कोट्यवधींच्या नोकऱ्या धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 09:58 IST

केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या धोरणावर टीका करताना वरुण गांधी यांनी आता खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे

ठळक मुद्देआजचा तरुण रोजगाराच्या शोधात भटकंती करत आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम असून राजकारण नंतर, देशासाठी काहीही करायची माझी तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.  

नवी दिल्ली - भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. तसेच ते केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ते भाजपाच्या धोरणांवर जाहीरपणे टीका करताना दिसून येत आहेत. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणावरही त्यांनी टीका केली आहे. 

केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या धोरणावर टीका करताना वरुण गांधी यांनी आता खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पीलभीत येथील गांधी सभागृहात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार धोक्यात असल्याचं म्हटलं. खासगीकरणाच्या नावावर सगळं विकलं चाललंय, हा सरकारचा मोठा डाव असल्याचं ते म्हणाले. खासगीकरण आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच आर्थिक व्यवहारांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला फायद्याच्य तराजूत तोलणे योग्य नाही. सरकार नोकरी देण्याऐवजी नोकऱ्या काढून घ्यायचं काम करत आहे. त्यामुळेच, आजचा तरुण रोजगाराच्या शोधात भटकंती करत आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम असून राजकारण नंतर, देशासाठी काहीही करायची माझी तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.  

लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरुन सरकारविरुद्ध संताप

दरम्यान, वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. तसेच महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य दिनावरून सोशल मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडली होती. 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाbusinessव्यवसायjobनोकरी