शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लक्षद्वीपकडे वळले प्रत्येकाचे लक्ष! जगभरातून इंटरनेटवरील सर्चमध्ये ३००० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:43 IST

लवकरच बांधणार नवे विमानतळ; निमुळते, छाेटे बेट, उतरतील माेठी विमाने

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर आता भारताने लक्षद्वीपमध्ये नवे विमानतळ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. या विमानतळामुळे पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहेच, शिवाय संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही तो महत्त्वाचा ठरणार आहे. मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीनंतर ‘बाॅयकाॅट मालदीव’ची हाक भारतीयांनी दिली. त्यानंतर जगभरातील पर्यटकांच्या नजरा लक्षद्वीपकडे वळल्या. गेल्या २० वर्षांमध्ये कधी नव्हे एवढे इंटरनेटवर सर्च लक्षद्वीपबाबत करण्यात आले. तर नरेंद्र माेदी यांनी भेट दिल्यानंतर पर्यटनाशी संबंधित संकेतस्थळांवर लक्षद्वीपबाबत सर्चमध्ये ३००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. नरेंद्र माेदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली हाेती. त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी त्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली हाेती.

जायचे असेल तर आधी पाेलिसांची परवानगी घ्या

  • लाेकांनी इंटरनेटवर लक्षद्वीपमधील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांची माहिती शाेधली. याशिवाय तेथे कसे जावे, ही माहितीही प्रामुख्याने नेटकऱ्यांनी जाणून घेतली. 
  • ३६ बेटांचा समावेश असलेला लक्षद्वीप द्वीपसमूह हा केंद्रशासित प्रदेश आहे.
  • स्थानिक आदिवासींच्या रक्षणासाठी १९६७मध्ये मंजूर झालेल्या कायद्यानुसार तेथे जाण्यासाठी परवाना घ्यावा लागताे. यातून काही जणांना सूट दिलेली आहे. 
  • विदेशी पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये जाण्यासाठी वैध पासपाेर्ट आणि भारतात प्रवेशासाठी लागणारा व्हीसा आवश्यक आहे.

किती आहे परवाना शुल्क?

  • प्रत्येक अर्जदारासाठी ५० रुपये अर्जाचे शुल्क घेतले जाते.
  • १०० रुपये वारसा शुल्क १२ ते १८ वयाेगटातील मुलांसाठी लागते.
  • २०० रुपये वारसा शुल्क १८ वर्षांवरील लाेकांसाठी आहे.
  • याशिवाय भारतीय पर्यटकांना आपापल्या जिल्ह्यातून पाेलिस प्रमाणपत्रही सादर करावे लागते.

मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीमुळे भारतातील पर्यटक नाराज झाले. त्यानंतर मालदीवला जाणाऱ्या सर्व उड्डाणांचे बुकिंग काही कंपन्यांनी तत्काळ थांबविले. लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध कंपन्यांनी नवे पॅकेजेस जाहीर केले आहेत.

निमुळते, छाेटे बेट; उतरतील माेठी विमाने

मालदीवसाेबत वादाला ताेंड फुटल्यानंतर भारत सरकारने लक्षद्वीपमधील मिनिकाॅय बेटावर नवे विमानतळ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. या विमानतळावर प्रवासी तसेच लढाऊ विमानांसह इतर लष्करी विमानेदेखील उतरविता येतील, अशी याेजना सरकारने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी नवे विमानतळ झाल्यास केवळ पर्यटन क्षेत्रच नव्हे तर अरबी आणि हिंदी महासागरावर पाळत ठेवणे भारताला शक्य हाेणार आहे. मिनिकाॅय येथे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव भारतीय काेस्ट गार्डने सर्वप्रथम दिला हाेता. सध्याच्या प्रस्तावानुसार, भारतीय वायुसेना या ठिकाणी नेतृत्व करेल. सध्या अगात्ती येथेच एकेरी धावपट्टी असलेले विमानतळ आहे. या ठिकाणी विमाने उतरविण्यास बऱ्याच मर्यादा आहेत. मोठी विमाने तेथे उतरू शकत नाहीत.

टॅग्स :lakshadweep-pcलक्षद्वीपairplaneविमान