शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पराभवासाठी सर्वच जबाबदार, १९७७ मध्येही काँग्रेस अस्ताकडे पोहोचली होती पण... : पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 08:31 IST

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सर्वच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सर्वच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षही सातत्यानं बैठका घेऊन पराभवाची समीक्षा करण्याचे प्रयत्न करत आहे. नुकतीच काँग्रेस वर्किग कमिटीचीही बैठक पार पडली. यात काँग्रेसच्या पराभवाची कारणांची समीक्षा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्तावही दिला होता. परंतु तो नाकारण्यात आला.

दरम्यान, या पराभवानंतर गांधी कुटुंबीयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपलं मत व्यक्त केलं. निवडणुकातील पराभवासाठी कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार धरण्यास त्यांनी विरोध केला आणि ही जबाबदारी सर्वांची असल्याचंही त्यांनी सांगितलं. चिदंबरम यांनी आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान, यावर भाष्य केलं. 

हे पहिल्यांदाच नाही"काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागतोय हे पहिल्यांदाच झालेलं नाही. १९७७ चा काळ मला आजही आठवतोय. त्यावेळी काँग्रेस अस्ताकडे पोहोचली होती. आम्ही आव्हानांचा सामना करतोय हे खरं आहे. आमच्या समोर आव्हानं मोठी आणि गंभीर आहेत. परंतु आम्ही त्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत," असं चिदंबरम म्हणाले. 

सर्वच जबाबदार"पराभवासाठी सर्वच जण जबाबदार आहेत. निवडणुका असलेल्या पाच राज्यांत पक्षाचे महासचिव, सचिव, इन्चार्ज यांची नेमणूक केली होती. गोव्यात मीदेखील सीनिअर ऑब्झर्व्हर होतो. भुपेश बघेल उत्तर प्रदेशचे ऑब्झर्व्हर होते. अन्य नेते अन्य राज्यांमध्ये होते. यासाठी पराभवाची जबाबदारी ही सर्वांची आहे. गोव्याची जबाबदारी मी स्वीकार करतो. माझे सोबती गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडुराव यांनीदेखील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वांना एकत्र मिळून याचं उत्तर शोधावं लागेल," असंही त्यांनी सांगितलं.

"गांधी कुटुंबावर निशाणा साधणं चुकीचं"पराभवानंतर गांधी कुटुंबावर उचलल्या जात असलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधणं चुकीचं असल्याचं म्हटलं. सोनिया गांधींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीत राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. परंतु ऑगस्ट महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. आता जर नेतृत्वात बदल केले तर अन्य व्यक्तीला अंतरिम अध्यक्ष व्हावं लागेल. पण पुन्हा अंतरिम अध्यक्षांना हटवून अध्यक्ष निवडण्याचा कोणताही अर्थ नाही. सर्वांनाच पक्षाच्या निवडणुकांद्वारे पूर्णवेळ अध्यक्षाची निवड व्हावी, असंच वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमSonia Gandhiसोनिया गांधीElectionनिवडणूक