शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार...', केजरीवालांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:59 IST

Arvind Kejriwal Supreme Court Bail: अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे, पण सध्या ते तुरुंगातच राहतील.

Arvind Kejriwal Bail : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (12 जुलै) जामीन मंजूर केला. मात्र, केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. याचे कारण म्हणजे, सीबीआयने केजरीवालांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. 

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला. खंडपीठाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम 19 अंतर्गत अटक करण्याच्या आवश्यकतेशी संबंधित प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. कोर्टाने ईडीच्या अटक अधिकार आणि मद्य धोरणाशी संबंधित तीन प्रश्न तयार केले आणि सांगितले की 10 मेच्या आदेशानुसार केजरीवाल यांना अंतरिम जामिनावर सोडले जाईल.

स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना... न्यायमूर्ती म्हणाले की, फक्त चौकशी केल्याने तुम्हाला अटकेची परवानगी मिळत नाही. कलम 19 अंतर्गत याला कोणताही आधार नाही. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवताना विद्यमान खंडपीठाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला. केजरीवाल बराच काळ तुरुंगात असल्याचे खंडपीठाने मान्य केले. अंतरिम जामिनाच्या प्रश्नावर मोठ्या खंडपीठाकडून सुधारणा करता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, अरविंद केजरीवाल मागील 90 दिवसांपासून तुरुंगात कैद आहेत. त्यांना अंतरिम जामीन मिळावा, असे आम्हाला वाटते. जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असेही खंडपीठीने म्हटले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय