शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 00:51 IST

एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूचे धागे अमली पदार्थांशी जोडले गेल्यानंतर नशा आणि मादक पदार्थांच्या काळ्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. राजपूत प्रकरणात चर्चेत आला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देशात ड्रग्जच्या धंद्याला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्त्वाची संस्था आहे. एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार २०१८-२०१९ मध्ये एनसीबीने जवळपास २५६ किलो हेरॉईन, ३७५ किलो अफू, २.६६ किलो मॉरफीन, ३५१०६ किलो गांजा, ९५० किलो हशीश, २२ किलो कोकेन, २ किलोपेक्षा जास्त मेथाकुआलोन आणि ६० किलोपेक्षा जास्त एमपेथामाईनस पकडले होते. याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७.६० लाख गोळ्या, १०,३०० इंजेक्शन आणि १२८ किलो एफेड्रिन जप्त केले होते. एनसीबीने वेगवेगळ्या सरकारी एजन्सींच्या मदतीने अरुणाचल, बिहार, जम्मू-कश्मीर, झारखंड, मणिपूर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ७८८७ एकरवर उभे अफीमचे बेकायदा पीक नष्ट केले.

गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एजन्सीने यादरम्यान आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा,त्रिपुरा आणि तेलंगणामध्ये ४३०० एकरमध्ये गांजाचे उभे पीक नष्ट केले होते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान १२ महिन्यांत एजन्सीने न्यायालयाच्या माध्यमातून फक्त ६१ प्रकरणांतच शिक्षा दिली. एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात एनसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, वर्ष २०१८ मध्ये नशेच्या पदार्थप्रकरणी देशभरात ४९,४५० प्रकरणांत ६०१५६ लोकांना अटक झाली होती. गृहमंत्रालयाच्या २०१७-२०१८ च्या वार्षिक अहवालानुसार एनसीबीद्वारे ४५ प्रकरणी न्यायालयाने शिक्षा दिली.

टॅग्स :IndiaभारतDrugsअमली पदार्थ