शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

Poverty in India: भारताच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तिसरी व्यक्ती गरीब, या राज्यात अजूनही ५०% हून अधिक गरिबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:15 IST

Poverty in India: सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे.

नवी दिल्ली - सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक मानकांचा समावेश आहे. यातील गरिबीचे मानदंड सांगतात की, भारतामध्ये गरिबी वाढली आहे.

भारताच्या ग्रामीण भागात राहणारे ३३ टक्के लोक म्हणजे दर तिसरी व्यक्ती ही अत्यंग गरीब आहे. तर शहरामध्ये हे प्रमाण ८ टक्के आहे. येथे गरिबी ही पैशांच्या निकषावर निर्धारित करण्यात आलेली नाही. तर लोकांचे राहणीमान कसे आहे. शाळेत किती जण जातात. वीजेचा पुरवठा होतो की नाही, अशा विविध निकषांवर गरिबीचं आकलन करण्यात आलेलं आहे. याला Multi dimensional poverty असं म्हटलं आहे. या आधारावर भारतात २५ टक्के गरिबी आहे.

राज्यांचा विचार केला तर बिहारमध्ये ५२ टक्के आणि झारखंडमध्ये ४२ टक्के लोकसंख्या गरीब आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ३६ टक्के लोक सुविधा नसल्याने गरीब आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही सुमारे ५ टक्के लोक विविध सुविधांपासून वंचित असल्याने गरीब आहेत. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या आरोग्याबाबतच्या सर्व्हेमध्येही असंच चित्र दिसलं होतं.

भौतिक सुखसोईंचा विचार केल्यास शहरांमध्ये ९६ टक्के लोकांकडे तर ग्रामीण भागात ८४ टक्के कुटुंबांकडे पंखा आहे. तर २०२१ पर्यंत देशातील शहरांमधील ४० टक्के कुटुंबांकडे एसी पोहोचला आहे. तर गावामध्ये अजूनही केवळ १६ टक्क्यांहून कमी घरांमध्ये एसी कुलर आहेत. त्याचप्रमाणे शहरांमध्ये ६४ टक्के कुटुंबांकडे फ्रिज आहे. तर ग्रामीण भागात केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. म्हणजेच केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. तर शहरी भागात ३६ टक्के आणि ग्रामीण भागांत केवळ ९ टक्के घरांमध्ये वॉशिंग मशीन आहे. फॅमिली हेल्थ सर्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात ६० टक्के तर ग्रामीण भागात ४४ टक्के लोकांकडे दुचाकी आहेत. तर शहरांमध्ये १४ टक्के आणि ग्रामीण भागात ४.४ टक्के लोकांकडे चार चाकी आहेत.  

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था