शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Poverty in India: भारताच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तिसरी व्यक्ती गरीब, या राज्यात अजूनही ५०% हून अधिक गरिबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:15 IST

Poverty in India: सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे.

नवी दिल्ली - सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक मानकांचा समावेश आहे. यातील गरिबीचे मानदंड सांगतात की, भारतामध्ये गरिबी वाढली आहे.

भारताच्या ग्रामीण भागात राहणारे ३३ टक्के लोक म्हणजे दर तिसरी व्यक्ती ही अत्यंग गरीब आहे. तर शहरामध्ये हे प्रमाण ८ टक्के आहे. येथे गरिबी ही पैशांच्या निकषावर निर्धारित करण्यात आलेली नाही. तर लोकांचे राहणीमान कसे आहे. शाळेत किती जण जातात. वीजेचा पुरवठा होतो की नाही, अशा विविध निकषांवर गरिबीचं आकलन करण्यात आलेलं आहे. याला Multi dimensional poverty असं म्हटलं आहे. या आधारावर भारतात २५ टक्के गरिबी आहे.

राज्यांचा विचार केला तर बिहारमध्ये ५२ टक्के आणि झारखंडमध्ये ४२ टक्के लोकसंख्या गरीब आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ३६ टक्के लोक सुविधा नसल्याने गरीब आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही सुमारे ५ टक्के लोक विविध सुविधांपासून वंचित असल्याने गरीब आहेत. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या आरोग्याबाबतच्या सर्व्हेमध्येही असंच चित्र दिसलं होतं.

भौतिक सुखसोईंचा विचार केल्यास शहरांमध्ये ९६ टक्के लोकांकडे तर ग्रामीण भागात ८४ टक्के कुटुंबांकडे पंखा आहे. तर २०२१ पर्यंत देशातील शहरांमधील ४० टक्के कुटुंबांकडे एसी पोहोचला आहे. तर गावामध्ये अजूनही केवळ १६ टक्क्यांहून कमी घरांमध्ये एसी कुलर आहेत. त्याचप्रमाणे शहरांमध्ये ६४ टक्के कुटुंबांकडे फ्रिज आहे. तर ग्रामीण भागात केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. म्हणजेच केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. तर शहरी भागात ३६ टक्के आणि ग्रामीण भागांत केवळ ९ टक्के घरांमध्ये वॉशिंग मशीन आहे. फॅमिली हेल्थ सर्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात ६० टक्के तर ग्रामीण भागात ४४ टक्के लोकांकडे दुचाकी आहेत. तर शहरांमध्ये १४ टक्के आणि ग्रामीण भागात ४.४ टक्के लोकांकडे चार चाकी आहेत.  

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था