शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Poverty in India: भारताच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तिसरी व्यक्ती गरीब, या राज्यात अजूनही ५०% हून अधिक गरिबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:15 IST

Poverty in India: सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे.

नवी दिल्ली - सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टनुसार भारतातील राहणीमानाची स्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाली आहे. भारताच्या पर्यावरणीय परिस्थितीवर सीईसीने एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक मानकांचा समावेश आहे. यातील गरिबीचे मानदंड सांगतात की, भारतामध्ये गरिबी वाढली आहे.

भारताच्या ग्रामीण भागात राहणारे ३३ टक्के लोक म्हणजे दर तिसरी व्यक्ती ही अत्यंग गरीब आहे. तर शहरामध्ये हे प्रमाण ८ टक्के आहे. येथे गरिबी ही पैशांच्या निकषावर निर्धारित करण्यात आलेली नाही. तर लोकांचे राहणीमान कसे आहे. शाळेत किती जण जातात. वीजेचा पुरवठा होतो की नाही, अशा विविध निकषांवर गरिबीचं आकलन करण्यात आलेलं आहे. याला Multi dimensional poverty असं म्हटलं आहे. या आधारावर भारतात २५ टक्के गरिबी आहे.

राज्यांचा विचार केला तर बिहारमध्ये ५२ टक्के आणि झारखंडमध्ये ४२ टक्के लोकसंख्या गरीब आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ३६ टक्के लोक सुविधा नसल्याने गरीब आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही सुमारे ५ टक्के लोक विविध सुविधांपासून वंचित असल्याने गरीब आहेत. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या आरोग्याबाबतच्या सर्व्हेमध्येही असंच चित्र दिसलं होतं.

भौतिक सुखसोईंचा विचार केल्यास शहरांमध्ये ९६ टक्के लोकांकडे तर ग्रामीण भागात ८४ टक्के कुटुंबांकडे पंखा आहे. तर २०२१ पर्यंत देशातील शहरांमधील ४० टक्के कुटुंबांकडे एसी पोहोचला आहे. तर गावामध्ये अजूनही केवळ १६ टक्क्यांहून कमी घरांमध्ये एसी कुलर आहेत. त्याचप्रमाणे शहरांमध्ये ६४ टक्के कुटुंबांकडे फ्रिज आहे. तर ग्रामीण भागात केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. म्हणजेच केवळ २५ टक्के लोकांकडेच फ्रिज आहे. तर शहरी भागात ३६ टक्के आणि ग्रामीण भागांत केवळ ९ टक्के घरांमध्ये वॉशिंग मशीन आहे. फॅमिली हेल्थ सर्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात ६० टक्के तर ग्रामीण भागात ४४ टक्के लोकांकडे दुचाकी आहेत. तर शहरांमध्ये १४ टक्के आणि ग्रामीण भागात ४.४ टक्के लोकांकडे चार चाकी आहेत.  

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था