शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

'प्रत्येक हिंदूने चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, आम्ही संन्यासी त्यांचा सांभाळ करु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:49 IST

एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला नरसिम्हा सरस्वती यांनी दिला आहे

नवी दिल्ली - स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी देशातील लोकसंख्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांचा सांभाळ करणं शक्य नसेल तर आमच्याकडे सोपवा आम्ही सांभाळ करु असंही त्यांनी म्हटलं आहे. नरसिम्हा यांचा वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. 

नरसिम्हा सरस्वती महाराजांनी म्हटलं आहे की, 'हिंदूंना मी आव्हान करु इच्छितो की जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनप्रमाणे एखादा कठोर कायदा आणत नाही जेणेकरुन इस्लामिक जिहादींच्या संख्येवर नियंत्रण येईल तोपर्यंत हिंदूंना आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. प्रत्येक हिंदूने चार ते पाच मुलं जन्माला घातली पाहिजे. आपण इतकी मुलं सांभाळू शकत नाही असं म्हणणा-यांनी मुलं जन्माला घालून आम्हा संन्याशांककडे सोपवावीत, आम्ही त्यांचा सांभाळ करु. आम्ही त्यासाठी गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचं शिक्षणही पुर्ण करु'.

लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध परिस्थिती निर्माण होईल असंही ते बोलले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करताना सरस्वती महाराज यांनी आरोप केला आहे की, 'काही लोक लोकशाहीचा वापर करत आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपुर्ण जग हिंदूकडून हिसकावण्यात आलं आहे, आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे'.  

टॅग्स :Hinduहिंदू