शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 09:24 IST

अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे

गुवाहाटी - अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे अगदी खरं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आज करोडो रुपये आहेत. आता हे नेमकं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. 

एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही या ठिकाणी विकासाच्या योजना आणि कामे सुरु केली आहेत. 

बोमजा गावातील 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबांना 1.09 कोटी रुपये मोबदला म्हणून मिळाले आहेत. उर्वरित दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबाला 2.45 कोटी, तर दुस-या कुटुंबाला 6.73 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेश योग्य दिशा आणि प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री पेमा खांडू बोलले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासकरुन रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिलं जात असून डिजिटल क्षेत्रातही राज्य विकास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश