शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रत्येक मुलाला बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका; प्रचंड तापमानामुळे भविष्याला धोका, शेतीही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 11:24 IST

आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे.

नवी दिल्ली : आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे. उत्तर गोलार्धातील वाढते तापमान हे एक मोठ्या संकटाची चाहूल असून, एल निनोमुळे तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचत आहे. वाढत्या तापमानाचा आशियातील मोठ्या लोक संख्येवर परिणाम झाला आहे.

उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतीवरील संकट वाढत आहे. मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान संकट आणखी वाढले आहे. या संकटाचा परिणाम जसजसा तीव्र होत जाईल तसतसे उष्णतेच्या लाटा आणखी विध्वंसक होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'

मुलांच्या शिक्षणावर परिणाम

फिलीपिन्समध्ये उष्मा निर्देशांक धोक्याची पातळीवर गेल्याने शाळेचे तास कमी करावे लागले आहेत. एप्रिलच्या मध्यात, थायलंडमध्ये तापमान ४४.६ अंशांवर  पोहोचले. बांगलादेशची राजधानी ढाका येथेही ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे १९६० नंतरचे सर्वाधिक तापमान आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०३० च्या दशकात तापमान १.५ अंश सेल्सिअस ओलांडण्याची भीती आहे.

तापमानाचे परिणाम...

२ अब्ज पेक्षा अधिक शहरी लोकांवर प्रचंड तापमानाचा परिणाम होत आहे.

२०५० पर्यंत जगातील जवळजवळ प्रत्येक मुलाला उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल.

१९८० पासून तापमानाच्या एक्सपोजरमध्ये २०० टक्के वाढ .

मागील ८ वर्षे रेकॉर्डब्रेक तापमान वाढीची ठरली आहेत.

भारतावर काय परिणाम?

मार्च हा महिना आशियातील या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. चीनमध्ये २०२२ मध्ये भयंकर तापमान आणि दुष्काळानंतर सुमारे एक वर्षांनी १०० हून अधिक हवामान केंद्रांनी गेल्या महिन्यात चीनमध्ये सर्वोच्च तापमान नोंदवले.

भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये हवामानाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांत अति उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील प्रचंड बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेसारख्याच या घटना असतील आणि त्याचा भारतीय उपखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती आहे.