शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मुलाला बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका; प्रचंड तापमानामुळे भविष्याला धोका, शेतीही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 11:24 IST

आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे.

नवी दिल्ली : आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे. उत्तर गोलार्धातील वाढते तापमान हे एक मोठ्या संकटाची चाहूल असून, एल निनोमुळे तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचत आहे. वाढत्या तापमानाचा आशियातील मोठ्या लोक संख्येवर परिणाम झाला आहे.

उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतीवरील संकट वाढत आहे. मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान संकट आणखी वाढले आहे. या संकटाचा परिणाम जसजसा तीव्र होत जाईल तसतसे उष्णतेच्या लाटा आणखी विध्वंसक होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'

मुलांच्या शिक्षणावर परिणाम

फिलीपिन्समध्ये उष्मा निर्देशांक धोक्याची पातळीवर गेल्याने शाळेचे तास कमी करावे लागले आहेत. एप्रिलच्या मध्यात, थायलंडमध्ये तापमान ४४.६ अंशांवर  पोहोचले. बांगलादेशची राजधानी ढाका येथेही ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे १९६० नंतरचे सर्वाधिक तापमान आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०३० च्या दशकात तापमान १.५ अंश सेल्सिअस ओलांडण्याची भीती आहे.

तापमानाचे परिणाम...

२ अब्ज पेक्षा अधिक शहरी लोकांवर प्रचंड तापमानाचा परिणाम होत आहे.

२०५० पर्यंत जगातील जवळजवळ प्रत्येक मुलाला उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल.

१९८० पासून तापमानाच्या एक्सपोजरमध्ये २०० टक्के वाढ .

मागील ८ वर्षे रेकॉर्डब्रेक तापमान वाढीची ठरली आहेत.

भारतावर काय परिणाम?

मार्च हा महिना आशियातील या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. चीनमध्ये २०२२ मध्ये भयंकर तापमान आणि दुष्काळानंतर सुमारे एक वर्षांनी १०० हून अधिक हवामान केंद्रांनी गेल्या महिन्यात चीनमध्ये सर्वोच्च तापमान नोंदवले.

भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये हवामानाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांत अति उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील प्रचंड बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेसारख्याच या घटना असतील आणि त्याचा भारतीय उपखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती आहे.