शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'निदान आज तरी'.... सभापतींनी चक्क हात जोडले, तरी खासदारांचा गोधळ सुरूच होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:11 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली.

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांनी एकत्र येत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यसभा खासदारांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या दालनात गोंधळ घातला. त्यावेळी सभापती वैंकय्या नायडू यांनी चक्क उभे राहून, हात जोडून, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, अशी आर्जव केली. 

संसदेवरील हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्री अन् खासदारांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर, ससंदेच्या दोन्ही सभागृहातही मौन धारण करुन जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर, कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोधळ घालत कामकाम बंद पाडले. कावेरी नदीवर बंधारा बांधण्याच्या विरोधात आणि इतरही मुद्द्यांना धरुन डीएके, एआयएडीएमके खासदारांसह अन्य खासदारांनी गोंधळ घातला. तसेच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन नारेबाजी केली. त्यामुळे 10 मनिटानंतर बंद केलेलं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले. 

सभापती, वैंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना हात जोडून विनंती केली. तसेच, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, कारण आज तो दिवस आहे, ज्यादिवशी संसदेची रक्षा करण्यासाठी 9 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विशेष म्हणजे आत्ताच आपण त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात नायडू यांनी खासदारांना खडसावले. मात्र, खासदारांचा गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर शुक्रवारपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूdelhiदिल्लीMember of parliamentखासदार