शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

'निदान आज तरी'.... सभापतींनी चक्क हात जोडले, तरी खासदारांचा गोधळ सुरूच होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:11 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली.

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांनी एकत्र येत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यसभा खासदारांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या दालनात गोंधळ घातला. त्यावेळी सभापती वैंकय्या नायडू यांनी चक्क उभे राहून, हात जोडून, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, अशी आर्जव केली. 

संसदेवरील हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्री अन् खासदारांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर, ससंदेच्या दोन्ही सभागृहातही मौन धारण करुन जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर, कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोधळ घालत कामकाम बंद पाडले. कावेरी नदीवर बंधारा बांधण्याच्या विरोधात आणि इतरही मुद्द्यांना धरुन डीएके, एआयएडीएमके खासदारांसह अन्य खासदारांनी गोंधळ घातला. तसेच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन नारेबाजी केली. त्यामुळे 10 मनिटानंतर बंद केलेलं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले. 

सभापती, वैंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना हात जोडून विनंती केली. तसेच, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, कारण आज तो दिवस आहे, ज्यादिवशी संसदेची रक्षा करण्यासाठी 9 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विशेष म्हणजे आत्ताच आपण त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात नायडू यांनी खासदारांना खडसावले. मात्र, खासदारांचा गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर शुक्रवारपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूdelhiदिल्लीMember of parliamentखासदार