शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

बॉम्बस्फोट झाला तरी चिनाब पूल भक्कमच!

By admin | Updated: March 22, 2016 03:45 IST

पॅरिस येथील आयफेल टॉवर तसेच कुतूबिनारपेक्षाही सर्वात उंच असा रेल्वे पुल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर कोकण रेल्वेकडून उभारण्यात येत आहे

सुशांत मोरे,  जम्मूपॅरिस येथील आयफेल टॉवर तसेच कुतूबिनारपेक्षाही सर्वात उंच असा रेल्वे पुल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर कोकण रेल्वेकडून उभारण्यात येत आहे. हा पुल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कोकण रेल्वेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात असणारे बोगदे, पुल, रेल्वे मार्गाचे काम हे उत्तर रेल्वे, कोकण रेल्वे आणि इरकोनला देण्यात आले आहे. या प्रकल्पात सर्वात महत्वाचा मानला जाणाऱ्या चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात आहे. चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ किमी तर कुतूबिनारची उंची ही ७२ किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.पुलाचे काम ६0 टक्के पूर्ण झाले असून २0१८-१९ पर्यंत तो पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुलाच्या बांधकामासाठी २५ हजार मेट्रीक टन स्टील वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर पुल बांधल्यानंतर त्यावर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूलाच वरच्या भागात काही जाळयाही बसविण्यात येतील. जेणेकरुन एखाद्या ट्रेनमधून जाताना दहशतवाद्यांनी स्फोटके टाकल्यास ती जाळीत अडकतील. मजबूत स्टीलचे बांधकाम आणि स्फोटकांमुळे पुलाला फारसा धक्का बसू नये यासाठी बांधकामाचे करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुल सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. पुलाचा खर्च वाढला हे बांधकाम दहा वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून सुरु आहे. हा पुल २0१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता २0१८-१९ मध्ये पुल पूर्ण होणार आहे. याबाबत कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) सिध्देश्वर तेलगु यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी चिनाब पुलाची पुर्नरचना करण्यात आली. प्रकल्पाची मंजुर रक्कम ५१२ कोटी होती आता ती १,२00 कोटीपर्यंत गेली आहे. सध्या पुलाचे काम सुरु असून सुरक्षेसाठी १३0 सीआरपीएफ (सेन्ट्रल रिर्जव पोलिस फोर्स)तैनात आहेत. पूल पुर्ण होताच त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटिव्ही बसविण्यात येतील. चनाब पुलाच्या कामासाठी दिवसरात्री जवळपास १,५00 कर्मचारी राबत आहे. या पुलाचे आयुुर्मान हे १२0 वर्ष असणार आहे.चिनाब पुलाला आधार देण्यासाठी आर्च स्पेनचा (कमानी)आधार देण्यात येणार आहे. मुख्य कमानी जवळपास ४६७ मीटर एवढी असेल.