शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पंतप्रधान झालो तरीही तुमच्यासाठी कार्यकर्ताच; मोदींची वाराणसीमध्ये धन्यवाद रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:37 IST

भाषणाच्या सुरवातीला मोदींनी हर हर महादेवचा नारा दिला.

वाराणसी : एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी आज वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांना धन्यवाद रॅलीमध्ये संबोधित केले. याआधी त्यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात पूजा केली. पं. दीनदयाल हस्तकला संकुलामध्ये झालेल्या या रॅलीमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी मोदी हे देशातील सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री असल्याचे सांगितले. 

भाषणाच्या सुरवातीला मोदींनी हर हर महादेवचा नारा दिला. कार्यकर्त्यांचा आदेशाचे पालन करतो. त्यांनी सांगितले की, महिनाभर तुम्ही काशीमध्ये पाऊल ठेऊ शकत नाही. देशाने मला पंतप्रधान म्हणून जरी निवडले असेल पण मी तुमच्यासाठी कार्यकर्ताच असेन. तुमचा आदेश हा प्राधान्याने असेल, असे मोदी म्हणाले.

वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांनीच प्रचार केला. काशीच्या लोकांनी ही निवडणूक एक पर्व मानले, यामुळे येथील प्रत्येक कार्यकर्ता डिस्टिंक्शन मार्कनी पास झाला आहे. देशातील राजकीय वातावरणात हिंसकपणा वाढला आहे. बंगाल, केरळ, त्रिपुरा आणि काश्मीरमध्ये आमच्या हजारो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर सुरुच आहे, असा आरोप मोदी यांनी केला. 

काशीच्या मुलींनी स्कूटी यात्रा काढली होती, जी पूर्ण जगभरात चर्चेत होती. या विजयाने हे दाखवून दिले आहे की अंकगणिताच्या पुढे केमिस्ट्री असते, असेही मोदी यांनी सांगितले. 

आमच्या सरकारने सर्व जातींना एकत्र घेऊन जाण्याचे काम केले आहे. असे केले नसते तर आम्ही तिथेच राहिलो असतो. सवर्णांना आरक्षण हा त्याचाच भाग आहे. संसदेचा वापर चर्चा करण्यासाठी व्हायला हवा. जेव्हा विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा ते दंगा करतात. विरोधकांकडे संख्याबळ नसणे हे त्यांचेच कृत्य आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांच्या सरकारवेळी विरोधकांना संपविण्यात आले होते. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर तेथे हा बदल झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९