शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

"साक्षात देव आला तरी काही बदलणार नाही’’, बंगळुरूमधील त्या समस्येबाबत डी.के. शिवकुमारांची हतबल प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 20:29 IST

D.K. Shivakumar News: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. डी. के. शिवकुमार म्हणाले की, वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांचं निराकरण खुद्द दैवी हस्तक्षेप झाला तरी तातडीने होणार नाही. खुद्द देव जरी स्वर्गातून उतरून बंगळुरूच्या रस्त्यांवर आला  तरी एक, दोन किंवा तीन वर्षांमध्ये काही बदलणार नाही. परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे.

या समस्येवरील उपाय सूचवताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, आपण योग्य पद्धतीने योजना बनवण्याची आणि ती प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. आम्ही येत्या काही दिवसांत उत्तम कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेते आर. अशोक यांनी डी. के शिवकुमार यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, कर्नाटक सरकारकडे विकाासकामांसाठी पैसे नसल्याची बाब स्वीकार केल्यानंतर आता साक्षात देवही आले तरी पुढच्या दोन तीन वर्षांत बंगळुरूतील परिस्थिती बदलणार नाही, असं बंगळुरू विकास मंत्री डी. के. शिवकुमार सांगत आहेत. आर. अशोक पुढे म्हणाले की, जनतेला डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या सरकारकडून काही अपेक्षा उरलेली नाही, कर्नाटक आणि बंगळुरूसाठी काँग्रेस सरकार हे शाप बनलं आहे. तसेच लोक हे सरकार बदलण्यासाठी वाट पाहत आहेत.   

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस