शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"साक्षात देव आला तरी काही बदलणार नाही’’, बंगळुरूमधील त्या समस्येबाबत डी.के. शिवकुमारांची हतबल प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 20:29 IST

D.K. Shivakumar News: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. डी. के. शिवकुमार म्हणाले की, वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांचं निराकरण खुद्द दैवी हस्तक्षेप झाला तरी तातडीने होणार नाही. खुद्द देव जरी स्वर्गातून उतरून बंगळुरूच्या रस्त्यांवर आला  तरी एक, दोन किंवा तीन वर्षांमध्ये काही बदलणार नाही. परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे.

या समस्येवरील उपाय सूचवताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, आपण योग्य पद्धतीने योजना बनवण्याची आणि ती प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. आम्ही येत्या काही दिवसांत उत्तम कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेते आर. अशोक यांनी डी. के शिवकुमार यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, कर्नाटक सरकारकडे विकाासकामांसाठी पैसे नसल्याची बाब स्वीकार केल्यानंतर आता साक्षात देवही आले तरी पुढच्या दोन तीन वर्षांत बंगळुरूतील परिस्थिती बदलणार नाही, असं बंगळुरू विकास मंत्री डी. के. शिवकुमार सांगत आहेत. आर. अशोक पुढे म्हणाले की, जनतेला डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या सरकारकडून काही अपेक्षा उरलेली नाही, कर्नाटक आणि बंगळुरूसाठी काँग्रेस सरकार हे शाप बनलं आहे. तसेच लोक हे सरकार बदलण्यासाठी वाट पाहत आहेत.   

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस