शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीलाही रोखी रोखण्याचा हट्ट, एटीएममध्ये आजही नोटांचा खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:12 IST

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरी बँकांच्या एटीएम मशिन्समधे आजही नोटांचा खडखडाट आहे. अनेक एटीएम बंद आहेत. रोख व्यवहारांऐवजी प्लॅस्टिक करन्सी व डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढावे ही सरकारची इच्छा आहे. त्यामुळे रिझर्व बँकेकडूनच बँकांना नोटांचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

-  सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरी बँकांच्या एटीएम मशिन्समधे आजही नोटांचा खडखडाट आहे. अनेक एटीएम बंद आहेत. रोख व्यवहारांऐवजी प्लॅस्टिक करन्सी व डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढावे ही सरकारची इच्छा आहे. त्यामुळे रिझर्व बँकेकडूनच बँकांना नोटांचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.एटीएममधील नोटांच्या तुटवड्याविषयी माजी अर्थमंत्री चिदंबरम म्हणतात की, नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहारातून सुमारे १५ लाख कोटींची रक्कम बाहेर जाणार आहे, याची सरकारला कल्पना होती. रोख रकमेची कमतरता तातडीने कशी कमी करता येईल? त्यासाठी छोट्या रकमेच्या नोटा अधिक प्रमाणात अगोदरच छापून तयार ठेवता येतील काय? याचे नियोजन केले नाही.परिणामी, नोटांची टंचाई कायम राहिली. नोटांची मागणी व रिझर्व बँकेकडून होणारा पुरवठा यांत अंतर पडले. बँकांकडेच नोटा नसतील तर एटीएममध्ये त्या कुठून येणार?डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठी सरकारने एटीएम व त्यावरील भार कमी करण्याचे ठरवले असेल, तर व्यवहारांवर त्याचे काय दुष्परिणाम ओढवतील याचा विचार सरकारने केला आहे काय, ही शंका आहे.याचा त्रास सामान्यांना भोगावा लागेल. शिवाय अर्थकारणावरही त्याचा बराच नकारात्मक परिणाम संभवतो, असेही चिदम्बरम यांनी म्हटले आहे.नोटाबंदी झाल्यानंतर रोख चलन हाती नसल्याने लोकांना त्रास झाला. अनेक बँकांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. पैसे काढण्यावरही बंधने होती.नव्या नोटा आल्यानंतरही अनेक रिकॅलिबरेशन न झाल्याने असंख्य एटीएम मशिन्स बंद होती. आता नोटांची छपाई झाली असतानाही एटीएममध्ये पैसे नाहीत, ही वस्तुस्थितीआहे.मुंबई व दिल्ली वगळता देशात असंख्य एटीएम बंद आहेत. एटीएममधून रोख काढण्याचे नियम जरी बदलले नसले तरी काही बँकांच्या एटीएममध्ये अन्य बँकांचे कार्ड चालत नाही. आपल्या ग्राहकांना प्राधान्याने रोख मिळावी, यासाठी काही बँकांनी आपल्या एटीएममध्ये दुस-या बँकांचे कार्ड स्वीकारणे बंद केले आहे.एटीएममध्ये नोटांच्या तुटवड्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांकडे पुरेशा प्रमाणात नोटा नाहीत. रोज जितकी रोख लागते, त्याच्या २५ टक्के रक्कमही अनेकदा बँकांकडे नसते.दिल्ली-मुंबईतल्या ४ मोठ्या बँकांना १00 ते १२५ कोटींच्या नोटांची रोज गरज असते. मात्र छोट्या शहरांना पुरवठा व्हावा, यासाठी महानगरांच्या नोटांच्या पुरवठ्यात कपात झाली आहे. स्टेट बँकेसह अनेक बँकांनी अधिक रोख रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी लेखी स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडे केली.तरीही स्टेट बँकेच्या ५१ टक्के एटीएममध्येच सध्या रोख रकमेचा पुरवठा सुरू आहे. केरळ, राजस्थानात फक्त ३0 टक्के एटीएममध्ये पैसे आहेत. आंध्र, तेलंगण, बिहार, गुजरातमधे रोख रकमेची सर्वाधिक टंचाई आहे, असे समजते.

टॅग्स :atmएटीएम