शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 14:58 IST

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची प्रक्रिया देशात सुरू झाल्यानं बाजारपेठा आणि इतर सेवा देखील पुन्हा पूर्ववत होत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाला निमंत्रण देऊन असा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा बाळगता कामा नये, असं सक्त सूचना गृह सचिवांनी लिहिलेल्या पत्रात राज्यांच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारनं जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याची जबाबदारी सुयोग्य पद्धतीनं पार पाडणं. यासोबतच चाचण्या, ट्रेसिंग आणि उपचार या सरकारच्या रणनितीवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी अनलॉक संदर्भातील निर्णय घेतले आहेत. पण निर्बंध पुन्हा लादावेत की नको याचा संपूर्णपणे निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा, असंही नमूद करण्यात आलं आहे. 

कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याआधी संबंधित राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी संपूर्ण प्रक्रिया सतर्क राहूनच सुरू करावी. कोविड प्रोटकॉल अंतर्गत मास्कचं बंधन, हाताची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद ठिकाणी सुयोग्य वेंटिलेशन असणं बंधनकारक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात असताना या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, काही राज्यांमध्ये निर्बंधांमध्ये सूट जाहीर होताच पुन्हा एकदा बाजरपेठा आणि इतर ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांबाबत लोक गांभीर्य बाळगत नसल्याचं दिसून आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक