शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एटीएममधून निघाल्या 100 ऐवजी 500 च्या नोटा; अवघ्या काही तासांत एटीएम खळखळाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 01:45 IST

राजस्थान येथील भरतपूरमध्ये  एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील  अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते.

जयपूर, दि. 27 - राजस्थान येथील भरतपूरमध्ये  एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील  अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते. ही बातमी वा-यासारखी गावात पसरली आणि त्या एटीएमबाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागल्या. दरम्यान, या घटनेची माहिती बॅंकेला समजली असता बॅंक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत एटीएम खळखळाट झाले. अवघ्या तासभरात जवळपास 250 लोकांनी 2 लाख रुपये या एटीएममधून काढून नेले.  भरतपूरमधील डीग गावातील अॅक्सिस बँकेच्या या एटीएममध्ये ही घटना 24 जुलै रोजी घडली. येथील नई सडक मार्गावरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून लोक जेव्हा पैसे काढत होते तेव्हा 100 रुपयांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्यामुळे पैसे काढणा-यांना  पाचपट जास्त रक्कम मिळत असल्याने सुरुवातीला आश्चर्य वाटले. त्यानंतर अधिक पैसे मिळत असल्याच्या आनंदात त्यांनी तासांभरात एटीएमच रिकामी केले. या घटनेनंतर आता  बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांचे पत्ते शोधून त्यांना पैसे परत करण्याची विनंती करत आहेत. तसेच, पैसे काढणारे वेगवेगळ्या बॅंकाचे खातेधारक असल्यामुळे बॅक कर्मचा-यांना अडचणी येत आहेत. तर, काही लोकांनी पैसे परत देण्यास नकार दिला आहे. तर, रामराज नावाच्या व्यक्तीने त्यांना 16 हजार रुपये परत केले आहेत. त्यांना या एटीएममधून 4 हजारच्या ऐवजी 20 हजार रुपये मिळाले होते.दरम्यान, अॅक्सिस बॅंकेच्या डीग येथील शाखेचे मॅनेजर विपुल खंडेलवाल यांनी सांगितले की, एटीएमध्ये चुकीमुळे 100 रुपयांच्या सेल्फमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरण्यात आल्या, त्यामुळे ही घटना घडली.