शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

योगींचा ड्रीम प्रोजेक्ट! यूपीत स्पेशल सिक्युरिटी फोर्सची स्थापना; विनावॉरंट अटक करण्याचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 12:44 IST

या सुरक्षा दलाच्या ५ बटालियनसाठी १ हजार ७०० कोटी रक्कम अंदाजित आहे. ज्यात वेतन, भत्ते आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.

लखनऊ – उत्तर प्रदेशात योगी सरकारने नवीन विशेष सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. या सुरक्षा दलाचे अधिकार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(CISF) समान असतील. या सुरक्षा दलाकडे विना वॉरंट तपासणी करणे आणि कोणालाही अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत उत्तर प्रदेश सरकारने याबाबत रविवारी जनतेला माहिती दिली.

उत्तर प्रदेश स्पेशल सिक्युरिटी फोर्स(UPSSF) राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालये, प्रशासकीय कार्यालय, तीर्थक्षेत्र, मेट्रो, विमानतळे, बँक आणि वित्तीय संस्था, औद्योगिक संस्था यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. यूपी सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अतिरिक्त गृह सचिव अवनीश अवस्थी म्हणाले की, या सुरक्षा दलाच्या ५ बटालियनसाठी १ हजार ७०० कोटी रक्कम अंदाजित आहे. ज्यात वेतन, भत्ते आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.

तसेच पहिल्या टप्प्यात पीएसीच्या मदतीने काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन या दलाला पुढे घेऊन जाणार आहे. या सुरक्षा दलाच्या सदस्यांना विशेष अधिकाराची नियमावली दिली जाईल. महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेसाठी ९ हजार ९१९ कर्मचारी कार्यरत राहतील. पहिल्या टप्प्यात ५ बटालियन स्थापन करणार आहे. या बटालियनसाठी १ हजार ९१३ नवीन पदे निर्माण केली जातील. हे सुरक्षा दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल असं अवस्थींनी सांगितले.

या सुरक्षा दलातील जवान कोणत्याही न्यायधीशांच्या परवानीशिवाय, आदेशाशिवाय, वॉरंट नसताना कोणत्याही व्यक्तिला अटक करु शकते, त्या व्यक्तीची तपासणी करण्याचेही अधिकार देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या अधिकाराचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे असा आरोप टीकाकारांनी केला आहे. सरकारने अद्याप या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर दिले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश स्पेशल सिक्युरिटी फोर्सकडे सीआयएसएफप्रमाणे अधिकार देण्यात येणार आहेत. २६ जून रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी स्पेशल सिक्युरिटी फोर्स स्थापन करण्याची मान्यता दिली होती. गृहविभागाने आता यावर अधिसूचना काढली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथArrestअटक