शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

राजकारण करण्याचे दिवस संपले; पंतप्रधान मोदींची सूचक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 12:49 IST

आता फक्त मोर्चे काढून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, 'आम आदमी'च्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्यांनाच ते साथ देतात.

नवी दिल्लीः एक काळ असा होता, जेव्हा देशात सतत राजकारण होत होतं. पण आता दिवस बदललेत. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधी पक्षांत; जनतेसाठी तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं झालंय. आता फक्त मोर्चे काढून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, 'आम आदमी'च्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्यांनाच ते साथ देतात, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील आमदार-खासदारांना मार्गदर्शन केलं. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. 

देशातील ११५ मागास जिल्ह्यांचा विकास झाला, तर देशाचा विकास आपोआपच होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यांच्यातील उत्साह - ऊर्जा - जिद्द आणि धडाडीमुळे चित्र लवकर पालटू शकेल, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना केली. 

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जेव्हा एखादं लक्ष्य ठरवतं,  तेव्हा झटपट प्रगती करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे जे पुढारलेले आहेत, ते आणखी वेगाने पुढे जातात आणि मागे राहिलेले मागेच राहतात. या गोष्टीचा आपण विचार करायला हवा, असं पंतप्रधानांनी निदर्शनास आणलं. बऱ्याचदा जास्त वयाच्या व्यक्तीला मागास जिल्ह्यांमध्ये नियुक्त केलं जातं. अनेकदा, आपल्याला इथे कुठे पाठवलंय, असाच विचार होतो. ही मानसिकता बदलायला हवी, असंही त्यांनी सूचित केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद