शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

राजकारण करण्याचे दिवस संपले; पंतप्रधान मोदींची सूचक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 12:49 IST

आता फक्त मोर्चे काढून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, 'आम आदमी'च्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्यांनाच ते साथ देतात.

नवी दिल्लीः एक काळ असा होता, जेव्हा देशात सतत राजकारण होत होतं. पण आता दिवस बदललेत. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधी पक्षांत; जनतेसाठी तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं झालंय. आता फक्त मोर्चे काढून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, 'आम आदमी'च्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्यांनाच ते साथ देतात, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील आमदार-खासदारांना मार्गदर्शन केलं. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. 

देशातील ११५ मागास जिल्ह्यांचा विकास झाला, तर देशाचा विकास आपोआपच होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यांच्यातील उत्साह - ऊर्जा - जिद्द आणि धडाडीमुळे चित्र लवकर पालटू शकेल, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना केली. 

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जेव्हा एखादं लक्ष्य ठरवतं,  तेव्हा झटपट प्रगती करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे जे पुढारलेले आहेत, ते आणखी वेगाने पुढे जातात आणि मागे राहिलेले मागेच राहतात. या गोष्टीचा आपण विचार करायला हवा, असं पंतप्रधानांनी निदर्शनास आणलं. बऱ्याचदा जास्त वयाच्या व्यक्तीला मागास जिल्ह्यांमध्ये नियुक्त केलं जातं. अनेकदा, आपल्याला इथे कुठे पाठवलंय, असाच विचार होतो. ही मानसिकता बदलायला हवी, असंही त्यांनी सूचित केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद