शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

संपूर्ण लॉकडाउनमुळं कोरोना व्हायरस खेड्यापाड्यात पोहोचेल; राहुल गांधींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:59 IST

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून अर्थमंत्र्यांनी हातावरचे पोट असलेल्या ८० कोटी गरिबांना १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर राहुल गांधी यांनी स्तुतीसुमने उधळी होती. सरकार योग्य मार्गावर असल्याचे म्हटले होते. आता लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या संकटाकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकरचे लक्ष वेधले आहे.

राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाउनचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असं म्हटले आहे. देशातील वयस्कर लोक मोठ्या प्रमाणात खेड्यात राहतात. संपूर्ण लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची चाक थांबली आहे. परिणामी शहरात काम करणारे युवक आणि कामगार पुन्हा खेड्याकडे परत निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. खेड्याकडे निघालेल्या युवकांचे आई-वडील, आजोबा-आजी खेड्यात राहतात. शहरातून निघालेले युवक न कळतपणे कोरोना व्हायरस गावाकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. यातून खेड्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनला पर्याय काढावा, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

देशात लॉकडाउनची घोषणा केल्यापासून विविध राज्यातील कामगार स्थलांतर करत आहेत. रेल्वे आणि परिवहन यंत्रणा बंद असल्यामुळे अनेकजन पायी आपापल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारला सूचक इशारा दिला आहे.