शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संपूर्ण लॉकडाउनमुळं कोरोना व्हायरस खेड्यापाड्यात पोहोचेल; राहुल गांधींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:59 IST

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून अर्थमंत्र्यांनी हातावरचे पोट असलेल्या ८० कोटी गरिबांना १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर राहुल गांधी यांनी स्तुतीसुमने उधळी होती. सरकार योग्य मार्गावर असल्याचे म्हटले होते. आता लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या संकटाकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकरचे लक्ष वेधले आहे.

राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाउनचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असं म्हटले आहे. देशातील वयस्कर लोक मोठ्या प्रमाणात खेड्यात राहतात. संपूर्ण लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची चाक थांबली आहे. परिणामी शहरात काम करणारे युवक आणि कामगार पुन्हा खेड्याकडे परत निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. खेड्याकडे निघालेल्या युवकांचे आई-वडील, आजोबा-आजी खेड्यात राहतात. शहरातून निघालेले युवक न कळतपणे कोरोना व्हायरस गावाकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. यातून खेड्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनला पर्याय काढावा, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

देशात लॉकडाउनची घोषणा केल्यापासून विविध राज्यातील कामगार स्थलांतर करत आहेत. रेल्वे आणि परिवहन यंत्रणा बंद असल्यामुळे अनेकजन पायी आपापल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारला सूचक इशारा दिला आहे.