शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 22:09 IST

भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind kejriwal ( Marathi News ) : केंद्र सरकारने आज अचानक नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षातील नेते या निर्णयाचं स्वागत करत असताना विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला आहे. भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दहा वर्षांपासून देशावर राज्य करणारे मोदी सरकार आता ऐन निवडणुकीच्या आधी CAA कायदा घेऊन आलं आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती महागाई आणि बेरोजगारीमुळे संघर्ष करत असताना या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष वळवण्यासाठी ही लोकं CAA घेऊन आली आहेत. शेजारील तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकता मिळेल, असं सांगितलं जात आहे. म्हणजे सत्ताधारी आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी शेजारील देशातील नागरिकांना भारतात आणू इच्छित आहेत. जेव्हा आपल्या देशातील तरुणांकडे रोजगार नाही, तर शेजारील देशांमधून येणाऱ्या नागरिकांना रोजगार कोण देणार? त्यांच्यासाठी घरे कोण बनवणार? भाजप त्यांना नोकऱ्या देणार आहे का? भाजप त्यांच्यासाठी घरे बनवणार आहे का?  सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला आणि त्रासाला कंटाळून मागील १० वर्षांत ११ लाखांहून अधिक व्यापारी आणि उद्योजक देश सोडून गेले आहेत. त्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून भाजप शेजारील देशातील गरीब व्यक्तींना भारतात आणत आहे. फक्त आपली व्होट बँक वाढवण्यासाठी?" असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

"संपूर्ण देश आज CAA चा विरोध करत आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आपल्या लोकांना आधी घरे द्या आणि मग दुसऱ्या देशातील लोकांना इकडे आणा. स्थानिक लोकांचे रोजगार कमी होतात म्हणून जगभरातील सर्व देश दुसऱ्या देशातील गरिबांना आपल्या देशात येण्यापासून रोखतात. मात्र भाजप हा जगातील एकमेव असा पक्ष असेल जो शेजारच्या देशातील नागरिकांना इथं आणून राजकारण करत आहे. हे कृत्य देशविरोधी आहे," अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, "विशेषत्वाने जे बांगलादेशमधून होणाऱ्या स्थलांतराने आधीच ग्रस्त आहेत ते आसाम आणि उत्तर पूर्व भारतातील लोक याचा तीव्रपणे विरोध करत आहेत. भाजपने संपूर्ण आसाम आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांना धोका दिला आहे," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदी