शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
4
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
5
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
6
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
7
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
8
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
9
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
10
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
11
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
12
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
13
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
14
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
15
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
16
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
17
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
18
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
19
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
20
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 22:09 IST

भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind kejriwal ( Marathi News ) : केंद्र सरकारने आज अचानक नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षातील नेते या निर्णयाचं स्वागत करत असताना विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला आहे. भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दहा वर्षांपासून देशावर राज्य करणारे मोदी सरकार आता ऐन निवडणुकीच्या आधी CAA कायदा घेऊन आलं आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती महागाई आणि बेरोजगारीमुळे संघर्ष करत असताना या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष वळवण्यासाठी ही लोकं CAA घेऊन आली आहेत. शेजारील तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकता मिळेल, असं सांगितलं जात आहे. म्हणजे सत्ताधारी आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी शेजारील देशातील नागरिकांना भारतात आणू इच्छित आहेत. जेव्हा आपल्या देशातील तरुणांकडे रोजगार नाही, तर शेजारील देशांमधून येणाऱ्या नागरिकांना रोजगार कोण देणार? त्यांच्यासाठी घरे कोण बनवणार? भाजप त्यांना नोकऱ्या देणार आहे का? भाजप त्यांच्यासाठी घरे बनवणार आहे का?  सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला आणि त्रासाला कंटाळून मागील १० वर्षांत ११ लाखांहून अधिक व्यापारी आणि उद्योजक देश सोडून गेले आहेत. त्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून भाजप शेजारील देशातील गरीब व्यक्तींना भारतात आणत आहे. फक्त आपली व्होट बँक वाढवण्यासाठी?" असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

"संपूर्ण देश आज CAA चा विरोध करत आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आपल्या लोकांना आधी घरे द्या आणि मग दुसऱ्या देशातील लोकांना इकडे आणा. स्थानिक लोकांचे रोजगार कमी होतात म्हणून जगभरातील सर्व देश दुसऱ्या देशातील गरिबांना आपल्या देशात येण्यापासून रोखतात. मात्र भाजप हा जगातील एकमेव असा पक्ष असेल जो शेजारच्या देशातील नागरिकांना इथं आणून राजकारण करत आहे. हे कृत्य देशविरोधी आहे," अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, "विशेषत्वाने जे बांगलादेशमधून होणाऱ्या स्थलांतराने आधीच ग्रस्त आहेत ते आसाम आणि उत्तर पूर्व भारतातील लोक याचा तीव्रपणे विरोध करत आहेत. भाजपने संपूर्ण आसाम आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांना धोका दिला आहे," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदी