शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 22:09 IST

भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind kejriwal ( Marathi News ) : केंद्र सरकारने आज अचानक नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षातील नेते या निर्णयाचं स्वागत करत असताना विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला आहे. भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दहा वर्षांपासून देशावर राज्य करणारे मोदी सरकार आता ऐन निवडणुकीच्या आधी CAA कायदा घेऊन आलं आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती महागाई आणि बेरोजगारीमुळे संघर्ष करत असताना या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष वळवण्यासाठी ही लोकं CAA घेऊन आली आहेत. शेजारील तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकता मिळेल, असं सांगितलं जात आहे. म्हणजे सत्ताधारी आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी शेजारील देशातील नागरिकांना भारतात आणू इच्छित आहेत. जेव्हा आपल्या देशातील तरुणांकडे रोजगार नाही, तर शेजारील देशांमधून येणाऱ्या नागरिकांना रोजगार कोण देणार? त्यांच्यासाठी घरे कोण बनवणार? भाजप त्यांना नोकऱ्या देणार आहे का? भाजप त्यांच्यासाठी घरे बनवणार आहे का?  सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला आणि त्रासाला कंटाळून मागील १० वर्षांत ११ लाखांहून अधिक व्यापारी आणि उद्योजक देश सोडून गेले आहेत. त्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून भाजप शेजारील देशातील गरीब व्यक्तींना भारतात आणत आहे. फक्त आपली व्होट बँक वाढवण्यासाठी?" असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

"संपूर्ण देश आज CAA चा विरोध करत आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आपल्या लोकांना आधी घरे द्या आणि मग दुसऱ्या देशातील लोकांना इकडे आणा. स्थानिक लोकांचे रोजगार कमी होतात म्हणून जगभरातील सर्व देश दुसऱ्या देशातील गरिबांना आपल्या देशात येण्यापासून रोखतात. मात्र भाजप हा जगातील एकमेव असा पक्ष असेल जो शेजारच्या देशातील नागरिकांना इथं आणून राजकारण करत आहे. हे कृत्य देशविरोधी आहे," अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, "विशेषत्वाने जे बांगलादेशमधून होणाऱ्या स्थलांतराने आधीच ग्रस्त आहेत ते आसाम आणि उत्तर पूर्व भारतातील लोक याचा तीव्रपणे विरोध करत आहेत. भाजपने संपूर्ण आसाम आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांना धोका दिला आहे," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदी