शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीच्या मुलांकडे बंदोबस्त, लाठीचार्ज; बिहारमध्ये श्रावण सोमवारी चेंगराचेंगरी, ७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 08:41 IST

सोमवारच्या पहाटे मंदिरात मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी जास्त होती की धक्काबुक्की होऊ लागली.

जहानाबाद : श्रावणातील सोमवारी बिहारच्या जहानाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मखदुमपूरच्या बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. 

सोमवारच्या पहाटे मंदिरात मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी जास्त होती की धक्काबुक्की होऊ लागली. यात एकमेकांवर पडून सात लोकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जहानाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरु केले. श्रावण सोमवारी शिवमंदिरात खूप गर्दी होते. रविवारी रात्रीपासूनच हे लोक येण्यास सुरुवात झाली होती. बिहारमध्ये श्रावण महिन्यातील चौथा सोमवार होता. एसडीओ विकास कुमार म्हणाले की, रविवारी रात्री गर्दी खूप अधिक असते. चौथा सोमवार असल्याने आम्ही सतर्क होतो. वैद्यकीय टीमही तैनात केलेली होती. ही दुर्घटना कशी झाली त्यावर लवकरच अधिकृत वक्तव्य केले जाईल. 

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, प्रशासनाने लाठीचार्ज केला यामुळे चेंगराचेंगरी झाली. एनसीसीचे जवान तैनात करण्यात आले होते. बिहार पोलीस कुठेच दिसत नव्हते. तर अन्य एकाने सांगितले की, खाकी वर्दीतील लोकांशी गर्दीतील काही जणांची बाचाबाची झाली, यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे लोक घाबरले आणि मागे धावायला लागले यातून ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

टॅग्स :Biharबिहार