शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:10 IST

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांचे रक्त संतापाने उसळत असतानाच, भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांनी मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला आणि दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानात, त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मतभेद बाजूला ठेवून हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलाचे या कारवाईत अजिबात नुकसान झाले नाही आणि जवानांना खरचटलेही नाही. या हल्ल्याचे वृत्त येताच देशभर तिरंगा फडकावून, मिठाई वाटून आणि ‘जयहिंद’च्या घोषणा देत आनंद साजरा करण्यात आला. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनीही या हल्ल्याचे स्वागत केले. देशात आज उत्सवाचेच वातावरण होते, तर पाकिस्तानात मातम पसरला होता. हवाई दलाच्या या कारवाईची तयारी गेले १२ दिवस सुरू होती, पण ती माहिती अतिशय गुप्त ठेवण्यात आली.

हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.

पंतप्रधान मोदी होते वॉर रूममध्येही कारवाई सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील वॉर रूममधून त्यावर लक्ष ठेवून होेते. सकाळी त्यांनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, अधिकारी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी या कारवाईबाबत चर्चा केली, तसेच याचे परिणाम व बाळगायची दक्षता, यावरही विचारविमर्श केला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली,

‘जैश’च्या बालाकोटवर नेमके काय होते?जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर जलतरण तलाव होता. तोही नष्ट करण्यात आला आहे. दहशतवादी प्रशिक्षणासाठीच त्याचा वापर केला जात असे.येथे २६ प्रकारे दहशतवादी हल्ले करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात समुद्री अतिरेकी कारवायांचाही समावेश आहे. समुद्रमार्गे एखाद्या देशात वा भागात घुसून दहशतवादी कारवाई कशी करायची, हे समजण्यासाठी या जलतरण तलावात त्यांना शिकविले जात असे.यापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील कसाब व अन्य दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते. त्यांनाही याच प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले असावे, हे बालाकोट केंद्रातील जलतरण तलावामुळे स्पष्ट झाले.दहशतवादी टार्गेट, पाकला घडविली अद्दलअशा कारवाईला नॉन मिलिटरी आॅपरेशन (लष्करेतर कारवाई) म्हटले जाते. या कारवाईत पाकिस्तान या देशाला नव्हे, तर तिथे असलेल्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले होते. ही कारवाई म्हणजे पाकिस्तानशी युद्ध नव्हते. मात्र, दहशतवाद्यांना आश्रय व अर्थसाह्य देणाऱ्या पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना यांनाही या हल्ल्याने अद्दल घडली आहे.

११ दिवस तयारी सुरूहोती पूर्वतयारीपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथ सिंह बैठकीला हजर होते. पाकिस्तानातल्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ नष्ट करण्याच्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदिल दिला. त्याबाबत ११ दिवसांच्या पूर्वतयारीनंतर भारताने पाकिस्तानला मंगळवारी जोरदार हादरा दिला. पुलवामा हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीदझाले होते. हा हल्ला घडविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा, अशी प्रत्येक भारतीयाची मागणी होती. त्यानुसार पावले टाकण्यात आली.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी