शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया दूरच

By admin | Updated: May 5, 2014 16:32 IST

उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाही

उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाही
नाशिक : दहावीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या अकरावीच्या जागा पाहता नाशिकमध्ये प्रवेशाची फारशी चुरस नसल्याचा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत होणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नाशिकमध्ये राबविणे आवश्यक नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
पुणे आणि मुंबईत मागील वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आगामी अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाची लगबग सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांतील विद्यार्थ्यांची आणि महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत ऑनलाइन प्रवेशाची सर्व तयारी करण्याचे काम सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे, मंुबई या शहरांनंतर नाशिकमध्येही अशाच प्रकारे अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता गेल्या दोन वर्षांपासून वर्तविण्यात येत आहे. परंतु शहरातील उत्तीर्ण होणार्‍यांची संख्या आणि अकरावीच्या जागांची क्षमता लक्षात घेता तशी आवश्यकता नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयातच प्रवेशासाठी गर्दी करतात, परंतु नंतर दुसर्‍या महाविद्यालयाकडे वळतात, असा आजवरचा अनुभव असल्याने प्रवेशाची अडचण नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
--इन्फो-
ऑनलाइन पद्धत केवळ पुणे-मुंबईत
अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याची पद्धत केवळ मुंबई आणि पुणे या शहरांत राबविली जाते. त्यांच्याकडे तेवढ्या तुकड्या आणि विद्यार्थीसंख्या असतेच, शिवाय विस्तीर्ण शहर असल्याने प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी पोहचतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोठ्या शहरात हे शक्य होते. नाशिकच्या प्रवेशाच्या बाबतीत फारशी अडचण नाही. त्यामुळे आपणाला ऑनलाइन प्रवेश राबविण्याची गरज नाही. तूर्तात तरी असाच निर्णय आहे.
- नवनाथ औताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग