अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया दूरच
By admin | Updated: May 5, 2014 16:32 IST
उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाही
अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया दूरच
उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाहीनाशिक : दहावीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या अकरावीच्या जागा पाहता नाशिकमध्ये प्रवेशाची फारशी चुरस नसल्याचा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत होणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नाशिकमध्ये राबविणे आवश्यक नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पुणे आणि मुंबईत मागील वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आगामी अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाची लगबग सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांतील विद्यार्थ्यांची आणि महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत ऑनलाइन प्रवेशाची सर्व तयारी करण्याचे काम सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. पुणे, मंुबई या शहरांनंतर नाशिकमध्येही अशाच प्रकारे अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता गेल्या दोन वर्षांपासून वर्तविण्यात येत आहे. परंतु शहरातील उत्तीर्ण होणार्यांची संख्या आणि अकरावीच्या जागांची क्षमता लक्षात घेता तशी आवश्यकता नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयातच प्रवेशासाठी गर्दी करतात, परंतु नंतर दुसर्या महाविद्यालयाकडे वळतात, असा आजवरचा अनुभव असल्याने प्रवेशाची अडचण नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. --इन्फो-ऑनलाइन पद्धत केवळ पुणे-मुंबईतअकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याची पद्धत केवळ मुंबई आणि पुणे या शहरांत राबविली जाते. त्यांच्याकडे तेवढ्या तुकड्या आणि विद्यार्थीसंख्या असतेच, शिवाय विस्तीर्ण शहर असल्याने प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी पोहचतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोठ्या शहरात हे शक्य होते. नाशिकच्या प्रवेशाच्या बाबतीत फारशी अडचण नाही. त्यामुळे आपणाला ऑनलाइन प्रवेश राबविण्याची गरज नाही. तूर्तात तरी असाच निर्णय आहे. - नवनाथ औताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग