शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वीज दरवाढ अटळ! कोळशाच्या किंमती वाढविण्यास ठोस कारण, लवकरच...; कोल इंडियाच्या अध्यक्षांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 15:31 IST

Electricity Bill Hike: महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. 

Light Bill: घरातला स्वीच बोर्डवरील इंडिकेटर किती वीज खातो? काढून टाकल्यास लाईट बिल कमी येईल...

कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले. 

कोळशाच्या किमती वाढण्यामागे एक भक्कम आधार आहे. गेल्या पाच वर्षांत ही दरवाढ झालेली नाही. यंदा कामगारांच्या पगारावरही चर्चा झाली आहे. त्याचा परिणाम कोल इंडियाच्या आर्थिक परिस्थितीवरही होणार आहे. जेथे मनुष्यबळाचा खर्च खूप जास्त आहे अशा उपकंपन्यांमध्ये याचा परिणाम जाणवेल. यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बजेटनंतर १ एप्रिलपासून वीज दरवाढ होईल असे म्हटले आहे. असे झाल्यास सामान्य नागरिकांवर भरमसाठ महागाईचा डोंगर कोसळणार आहे. 

टॅग्स :electricityवीज