शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीज दरवाढ अटळ! कोळशाच्या किंमती वाढविण्यास ठोस कारण, लवकरच...; कोल इंडियाच्या अध्यक्षांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 15:31 IST

Electricity Bill Hike: महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. 

Light Bill: घरातला स्वीच बोर्डवरील इंडिकेटर किती वीज खातो? काढून टाकल्यास लाईट बिल कमी येईल...

कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले. 

कोळशाच्या किमती वाढण्यामागे एक भक्कम आधार आहे. गेल्या पाच वर्षांत ही दरवाढ झालेली नाही. यंदा कामगारांच्या पगारावरही चर्चा झाली आहे. त्याचा परिणाम कोल इंडियाच्या आर्थिक परिस्थितीवरही होणार आहे. जेथे मनुष्यबळाचा खर्च खूप जास्त आहे अशा उपकंपन्यांमध्ये याचा परिणाम जाणवेल. यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बजेटनंतर १ एप्रिलपासून वीज दरवाढ होईल असे म्हटले आहे. असे झाल्यास सामान्य नागरिकांवर भरमसाठ महागाईचा डोंगर कोसळणार आहे. 

टॅग्स :electricityवीज