शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अयोध्येतील रामपथावरून विजेच्या दिव्यांची झाली चोरी? आरोप प्रत्यारोपांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:43 IST

Ayodhya News: अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अयोध्या चर्चेत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील राम मंदिरात झालेली पाण्याची गळती, रामपथावरील रस्त्याची झालेली दुरवस्था यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दरम्यान आता, अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

याबाबत अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, ठेकेदाराने विजेचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे दिवे चोरीस जाणं शक्य नाही. कारण अयोध्येमध्ये दिवसरात्र पोलिसांची गस्त असते. सुमारे ३६०० दिवे चोरीस गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही आम्ही या प्रकरणाचा तपास करणार आहोत.  

मात्र या आरोप प्रत्यारोपांमुळे आता अयोध्येतील रामपथावर लावण्यात येणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या कामात घोटाळा झाल्याच्या आरोपांना उधाण आलं आहे. ठेकेदाराने जे दिवे चोरीस गेल्याचा दावा केला आहे ते लावलेच गेले नाहीत असा दावा करण्यात येत आहे.  आता विजेचे दिवे चोरीस गेले की लावण्यातच आले नाहीत, हे आता तपासामधून समोर येणार आहे. मात्र जर हे विजेचे दिवे लावलेच गेले नसतील, तर तो उत्तर प्रदेशमधील मोठा घोटाळा ठरेल. कारण हे प्रकरण थेट रामलल्लांशी संबंधित आहे. एवढंच नाही तर रामललांवर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांच्या भावनेशी निगडित आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश