शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अयोध्येतील रामपथावरून विजेच्या दिव्यांची झाली चोरी? आरोप प्रत्यारोपांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:43 IST

Ayodhya News: अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अयोध्या चर्चेत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील राम मंदिरात झालेली पाण्याची गळती, रामपथावरील रस्त्याची झालेली दुरवस्था यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दरम्यान आता, अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

याबाबत अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, ठेकेदाराने विजेचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे दिवे चोरीस जाणं शक्य नाही. कारण अयोध्येमध्ये दिवसरात्र पोलिसांची गस्त असते. सुमारे ३६०० दिवे चोरीस गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही आम्ही या प्रकरणाचा तपास करणार आहोत.  

मात्र या आरोप प्रत्यारोपांमुळे आता अयोध्येतील रामपथावर लावण्यात येणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या कामात घोटाळा झाल्याच्या आरोपांना उधाण आलं आहे. ठेकेदाराने जे दिवे चोरीस गेल्याचा दावा केला आहे ते लावलेच गेले नाहीत असा दावा करण्यात येत आहे.  आता विजेचे दिवे चोरीस गेले की लावण्यातच आले नाहीत, हे आता तपासामधून समोर येणार आहे. मात्र जर हे विजेचे दिवे लावलेच गेले नसतील, तर तो उत्तर प्रदेशमधील मोठा घोटाळा ठरेल. कारण हे प्रकरण थेट रामलल्लांशी संबंधित आहे. एवढंच नाही तर रामललांवर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांच्या भावनेशी निगडित आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश