शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तीन खोल्यांच्या घराचं वीज बिल आलं 38 अब्ज, न भरल्यानं कापलं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 18:01 IST

तुमच्या घराचं एका महिन्याचं  वीज बिल हजार किंवा लाखात नाही तर अब्जावधीत आलं तर...झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका व्यक्तीला तब्बल 38 अब्ज वीज बिल आलं आहे.

जमशेदपूर, दि. 14 - तुमच्या घराचं एका महिन्याचं  वीज बिल हजार किंवा लाखात नाही तर अब्जावधीत आलं तर...झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका व्यक्तीला तब्बल 38 अब्ज वीज बिल आलं आहे. इतकंच नाही तर बीलाची रक्कम न भरल्यानं त्याच्या घराची वीज जोडणीही तोडण्यात आली आहे.  

जमशेदपूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या बी. आर. गुहा यांना एक महिन्याचं वीज बिल 38 अब्ज रूपये आलं आहे. आमच्या घरात तीन खोल्या आहेत, ज्यामध्ये तीन पंखे, तीन ट्युबलाईट आणि एक टीव्ही इतक्याच उपकरणांचा वापर केला जातो, असं असतानाही इतकं बिल कसं काय येऊ शकतं? हे समजायला मार्ग नाही असं गुहा म्हणाले. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. 

इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे. माझ्या आईला मधुमेहाचा आजार आहे आणि वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आलेलं एवढं बिल पाहून दोघंही चक्रावून गेले होते. अशी प्रतिक्रिया गुहा यांच्या मुलीनं दिली आहे.  या प्रकरणाची तक्रार आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे, वीज बिलात गडबड असेल तर सुधारणा केली जाईल, असं झारखंड इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिका-यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. 2014 मध्ये हरियाणात एका पानवाल्याला कोट्यवधीचं वीज बिल आलं होतं.  राजेश सोनीपत असं या पानवाल्याचं नाव होतं. त्याला 132 कोटी वीज बिल आलं होतं.  दरम्यान, इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.