शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Electricity Bill: केंद्राचा एक निर्णय अन् महाराष्ट्रात वीज बिल महागण्याची शक्यता; झटका देण्याची तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:07 IST

आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे.

येत्या काही काळात वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे. 

एनटीपीसीसह देशातील काही राज्यांना रेल्वे आणि समुद्र मार्गे कोळशाचा पुरवठा केला जावा, असा निर्णय काही काळापूर्वीच केंद्र सरकारने घेतला होता. म्हणजेच काही प्रमाणावर कोळसा हा रस्ते, रल्वे मार्गे तर काही प्रमाणावर कोळसा हा समुद्र मार्गे नेण्यात यावा असा हा निर्णय आहे. यामुळे या नव्या निर्णयामुळे वीज उत्पादन प्रकल्पांचा खर्च १० टक्क्यांनी वाढणार आहे. 

सीएनबीसीच्या वृत्तानुसार कोळशाच्या आवश्‍यकतेच्या एक पंचमांश भागाची वाहतूक जरी नव्या पद्धतीने झाली तरी वीज उत्पादनाचा खर्च वाढणार आहे. याचा थेट भार हा ग्राहकांवर टाकला जात असतो. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत विजेचे बिल वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पंजाबला २०० कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. संपूर्ण कोळसा रेल्वे मार्गाने मिळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पंजाबने केली आहे.

उर्जा मंत्रालयाने गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब आणि NTPC यांना त्यांच्या कोळशाच्या गरजेपैकी काही भाग रेल्वे-शिप-रेल्वे मोडद्वारे वाहतूक करण्यास सांगितले आहे. या पद्धतीत खाणींतील कोळसा प्रथम रेल्वेच्या माध्यमातून जवळच्या बंदरात नेला जातो, त्यानंतर समुद्रमार्गे तो कोळसा ऊर्जा प्रकल्पाच्या जवळच्या बंदरात पोहोचतो. त्यानंतर तेथून कोळसा रेल्वेने वीज प्रकल्पात नेला जातो.

का घेतला असा महागडा निर्णय...कोळसा रेल्वे आणि रस्त्याने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाठवला जातो. रस्त्याने वाहतूक केल्यास अपघाताची भीती असते. तसेच प्रदूषणही होते. तसेच रस्ते अरुंद असल्याने देखील वाहतूक करण्यासाठी वेळ लागतो. यातून पर्याय काढण्यासाठी केंद्राने हा मार्ग स्वीकारला आहे. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण