शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Electricity Bill: केंद्राचा एक निर्णय अन् महाराष्ट्रात वीज बिल महागण्याची शक्यता; झटका देण्याची तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:07 IST

आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे.

येत्या काही काळात वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे. 

एनटीपीसीसह देशातील काही राज्यांना रेल्वे आणि समुद्र मार्गे कोळशाचा पुरवठा केला जावा, असा निर्णय काही काळापूर्वीच केंद्र सरकारने घेतला होता. म्हणजेच काही प्रमाणावर कोळसा हा रस्ते, रल्वे मार्गे तर काही प्रमाणावर कोळसा हा समुद्र मार्गे नेण्यात यावा असा हा निर्णय आहे. यामुळे या नव्या निर्णयामुळे वीज उत्पादन प्रकल्पांचा खर्च १० टक्क्यांनी वाढणार आहे. 

सीएनबीसीच्या वृत्तानुसार कोळशाच्या आवश्‍यकतेच्या एक पंचमांश भागाची वाहतूक जरी नव्या पद्धतीने झाली तरी वीज उत्पादनाचा खर्च वाढणार आहे. याचा थेट भार हा ग्राहकांवर टाकला जात असतो. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत विजेचे बिल वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पंजाबला २०० कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. संपूर्ण कोळसा रेल्वे मार्गाने मिळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पंजाबने केली आहे.

उर्जा मंत्रालयाने गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब आणि NTPC यांना त्यांच्या कोळशाच्या गरजेपैकी काही भाग रेल्वे-शिप-रेल्वे मोडद्वारे वाहतूक करण्यास सांगितले आहे. या पद्धतीत खाणींतील कोळसा प्रथम रेल्वेच्या माध्यमातून जवळच्या बंदरात नेला जातो, त्यानंतर समुद्रमार्गे तो कोळसा ऊर्जा प्रकल्पाच्या जवळच्या बंदरात पोहोचतो. त्यानंतर तेथून कोळसा रेल्वेने वीज प्रकल्पात नेला जातो.

का घेतला असा महागडा निर्णय...कोळसा रेल्वे आणि रस्त्याने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाठवला जातो. रस्त्याने वाहतूक केल्यास अपघाताची भीती असते. तसेच प्रदूषणही होते. तसेच रस्ते अरुंद असल्याने देखील वाहतूक करण्यासाठी वेळ लागतो. यातून पर्याय काढण्यासाठी केंद्राने हा मार्ग स्वीकारला आहे. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण