शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 19:00 IST

देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे.

देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे. या हायवेवर फक्त इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी असणार आहे.

सध्या देशातील सर्व महामार्गावर चालणारे वाहन पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर चालते, पण, विद्युत महामार्ग हा असा महामार्ग असेल ज्यावर सर्व इलेक्ट्रिक वाहने धावणार आहेत.पण, महामार्गाच्या वरच्या बाजूला तारा असतील. या महामार्गावर गाड्यांप्रमाणे धावणाऱ्या वाहनांना या तारांमधून वीज मिळणार असून ही वीज या वाहनांसाठी इंधन म्हणून काम करेल. या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंटही बसविण्यात येणार आहेत.

सरकार दिल्ली ते जयपूर दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बनवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील दौसा येथे ही घोषणा केली. हा महामार्ग पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि त्यात फक्त इलेक्ट्रिक वाहने धावतील. पूर्णपणे तयार झाल्यानंतर हा देशातील पहिला ई-हायवे असेल.

भारत सरकार हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2021 मध्ये ही घोषणा केली होती. यात भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्याचे लक्ष्य साध्य करेल. हा विद्युत महामार्ग हेच उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हा महामार्ग पूर्णपणे पर्यावरणपूरक होणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. यामध्ये वाहने चालवण्यासाठी विजेचा वापर केला जाईल, जे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त असेल. त्यामुळे थेट पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. त्याचबरोबर पर्यावरणासाठीही ते फायदेशीर ठरणार आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर असण्यासोबतच, ई-हायवे लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय घट आणेल. सध्या वस्तूंच्या किमती वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाहतूक खर्च. वाहतूक खर्च कमी झाल्यास वस्तू स्वस्त होऊ शकतात. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांची ही घोषणा देशातील इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या मार्गातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.

IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ई-हायवे बनवणारा भारत हा पहिला देश नाही. स्वीडन आणि जर्मनीमध्ये इलेक्ट्रिक हायवे आधीच वापरले जात आहेत. ई-हायवे सुरू करणारा स्वीडन हा जगातील पहिला देश आहे. स्वीडनने 2016 मध्ये ई-हायवेची चाचणी सुरू केली आणि 2018 मध्ये पहिला ई-हायवे सुरू केला. स्वीडननंतर जर्मनीने 2019 मध्ये इलेक्ट्रिक हायवे सुरू केला.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरी