शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 19:00 IST

देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे.

देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे. या हायवेवर फक्त इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी असणार आहे.

सध्या देशातील सर्व महामार्गावर चालणारे वाहन पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर चालते, पण, विद्युत महामार्ग हा असा महामार्ग असेल ज्यावर सर्व इलेक्ट्रिक वाहने धावणार आहेत.पण, महामार्गाच्या वरच्या बाजूला तारा असतील. या महामार्गावर गाड्यांप्रमाणे धावणाऱ्या वाहनांना या तारांमधून वीज मिळणार असून ही वीज या वाहनांसाठी इंधन म्हणून काम करेल. या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंटही बसविण्यात येणार आहेत.

सरकार दिल्ली ते जयपूर दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बनवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील दौसा येथे ही घोषणा केली. हा महामार्ग पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि त्यात फक्त इलेक्ट्रिक वाहने धावतील. पूर्णपणे तयार झाल्यानंतर हा देशातील पहिला ई-हायवे असेल.

भारत सरकार हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2021 मध्ये ही घोषणा केली होती. यात भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्याचे लक्ष्य साध्य करेल. हा विद्युत महामार्ग हेच उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हा महामार्ग पूर्णपणे पर्यावरणपूरक होणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. यामध्ये वाहने चालवण्यासाठी विजेचा वापर केला जाईल, जे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त असेल. त्यामुळे थेट पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. त्याचबरोबर पर्यावरणासाठीही ते फायदेशीर ठरणार आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर असण्यासोबतच, ई-हायवे लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय घट आणेल. सध्या वस्तूंच्या किमती वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाहतूक खर्च. वाहतूक खर्च कमी झाल्यास वस्तू स्वस्त होऊ शकतात. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांची ही घोषणा देशातील इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या मार्गातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.

IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ई-हायवे बनवणारा भारत हा पहिला देश नाही. स्वीडन आणि जर्मनीमध्ये इलेक्ट्रिक हायवे आधीच वापरले जात आहेत. ई-हायवे सुरू करणारा स्वीडन हा जगातील पहिला देश आहे. स्वीडनने 2016 मध्ये ई-हायवेची चाचणी सुरू केली आणि 2018 मध्ये पहिला ई-हायवे सुरू केला. स्वीडननंतर जर्मनीने 2019 मध्ये इलेक्ट्रिक हायवे सुरू केला.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरी