शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:41 IST

काल स्टेट बँक इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

काल स्टेट बँक इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. इलेक्टोरल बाँड्सबाबत देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर निर्णय देत सर्व याद्या सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रोरल बाँडबाबत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी इलेक्ट्रोरल बाँड ही प्रणाली पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, इलेक्टोरल बाँड कदाचित परिपूर्ण नसतील पण ते पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले आहे. या आधी अस्तित्वात असलेली व्यवस्था यापेक्षा चांगली नव्हती. पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले आहे. पक्षाला खात्यातून किमान पैसे येत आहेत, त्याची आकडेवारी उपलब्ध होत आहे. 

इलेक्टोरल बॉण्डमध्ये तब्बल २७ कंपन्यांनी केला ५० कोटींपेक्षा जास्त खर्च, पाहा यादीत कुणाचे नाव?

"आता प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचणारा पैसा व्हाईट आहे. एक चांगली प्रणाली येईपर्यंत, आम्ही आधीच अपडेट केलेल्या प्रणालीमध्ये काम करत आहोत. याशिवाय आता आमचे प्रयत्न अधिक चांगल्या सुधारणा घडवून आणण्याचे असले पाहिजेत, पारदर्शकता असावी आणि ती पूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा चांगली असावी, असंही निर्मला सीतारमण म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करत आहे. इलेक्टोरल बाँडचे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. एसबीआयने ही आकडेवारी सादर केली आहे. ही व्यवस्था चांगली नाही, पण जोपर्यंत परिपूर्ण व्यवस्था येत नाही तोपर्यंत ती पूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा चांगली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काहीही बोलत नाही. पक्षाला रोख स्वरूपात देणगी देण्याऐवजी किमान पैसे खात्यातून आलेले बरे, जेणेकरून त्याबाबतची किमान माहिती तरी राहते, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असंही सीतारमण म्हणाल्या.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाElectionनिवडणूक