शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

Election: होऊ द्या खर्च! निवडणूक आयोगाने वाढवली लोकसभा, विधासभेच्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 11:32 PM

Election Commission of India : निवडणूक आयोगाने Lok Sabha निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली - निवडणूक लढवायची म्हटली की वारेमाप खर्च हा आलाच. मात्र हा खर्च निवडणूक आयोगाच्या चौकटीत बसवताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आता निवडणूक आयोगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तत्पूर्वी २०१४ मध्ये उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये त्यात अजून १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्याबरोबरच आयोगाने अधिकाऱ्यांची एक समितीही बनवली होती. तसेच या समितीला निवडणूक खर्चाशी संबंधित मुद्द्यांचे अध्ययन करण्याची सूचना देण्यात आली होती.

आता लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास २०१४ मध्ये मोठ्या राज्यात निवडणुकीचा खर्च ७० लाख रुपये एवढा निश्चित करण्यात आला होता. तो आता ९५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर छोट्या राज्यांमध्ये लोकसभेसाठी २०१४ मध्ये हा खर्च ५४ लाख होता. तो आता वाढवून ७५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.

तर विधानसभेच्या जागांचा विचार केल्यास २०१४ मध्ये मोठ्या राज्यांतील उमेदवारांसाठी २८ लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा होती. ती आता ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर छोट्या राज्यांच्या जागांवर एका उमेदवाराला २०१४ मध्ये २० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची सूट देण्यात आली होती. ती आता २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.   

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा