शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गुजरातेत इलेक्शन? काही माहितीच नाही, या जिल्ह्यातील लोकांची अशीही व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 10:42 IST

देशाला मीठ पुरविणाऱ्या जिल्ह्याची स्थिती

रमाकांत पाटीलपाटली (सुरेंद्रनगर) : देशात ५-जी सेवा सर्वप्रथम गुजरातमध्ये सुरू झाली असली तरी आणि ‘गुजरात मॉडेल’ची कितीही चर्चा सुरू असली तरी येथील मीठ उत्पादक आगरियांची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे. गुजरात विधानसभेसाठी मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना ‘चुटणी क्यारे छे, अमने नई खबर...’ अशा प्रतिक्रिया खाराघोडा या भागातील मिठाच्या रणात फिरताना ऐकायला मिळाल्या.

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटली गावच्या पुढे शेकडो एकर क्षेत्रात मिठाचे रण आहे. देशात लागणाऱ्या एकूण मिठाचे २५ टक्के मीठ या भागात तयार होते. या वस्तींमध्ये कुठलीही सुविधा नाही.  शिक्षणासाठी हंगामी शाळा सुरू असल्या तरी त्या नावालाच आहेत. या भागात आठ दिवसांतून टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आहे त्या भांड्यामध्ये पाणी भरतात आणि ते पाणी आठ दिवस पुरविण्यासाठी त्यांची कसरत असते. आरोग्य सेवा तर नाहीच, अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जात हे आगरिक मीठ उत्पादनासाठी गुंतले आहेत.

जेवणाच्या बदल्यात मतदान अन् रक्कमnसुरेंद्रनगर जिल्ह्यातील दसाडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात १० हजार आगरिक असून, त्यांना मतदानाच्या दिवशी ट्रक अथवा इतर वाहनाने राजकीय पक्षाचे नेते मतदान केंद्रावर आणतात. nत्यांना बुडीत मजुरीची रक्कम, तसेच जेवण दिले जाते आणि कसे व कुठे मतदान करावे त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून मतदान करून घेतले जाते, अशी माहिती या भागातील जाणकार लक्ष्मीकांतभाई चव्हाण यांनी दिली.

निवडणुकीचा कुठलाही मागमूस नाहीगुजरात निवडणुकीचा कुठलाही मागमूस तेथे दिसून आला नाही.  खोडाभाई वनाभाई ठाकूर यांनी सांगितले,  ‘‘निवडणूक कधी आहे ते आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी सीताबेन यांनाही निवडणुकीची तारीख माहीत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भागातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांबाबत व मुख्यमंत्र्यांचे नावही त्यांना माहीत नाही.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Electionनिवडणूक