शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

प. बंगालमध्ये प्रचारबंदी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:49 IST

मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोग आपले स्वातंत्र्यच हरवून बसला आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी गुरुवारी केली.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या दोन सभा झाल्यानंतरच प्रचारबंदी लागू करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय पक्षपाती आहे. मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोग आपले स्वातंत्र्यच हरवून बसला आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी गुरुवारी केली. पंतप्रधान मोदी यांच्या शुक्रवारी सभा झाल्यानंतर मगच प्रचारबंदी करण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, तेलगू देसम, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी निवडणूक आयोगाने प. बंगालमध्ये प्रचारबंदीचा निर्णय भाजपच्या दबावाखाली घेतला असल्याची टीका केली आहे. निवडणूक आयोगामार्फत भाजप प. बंगालमध्ये आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण करू पाहत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.निवडणूक आयोग सध्या भाजपसाठी वेगळी व अन्य विरोधी पक्षांसाठी वेगळी पट्टी वापरत आहे, अशी टीका द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ते म्हणाले की, कोलकात्यात हिंसाचार घडवून आणणाऱ्या भाजपच्या गुंडांना शिक्षा करण्याऐवजी निवडणूक आयोगाने लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेलाच शिक्षा सुनावली आहे. या आयोगामार्फत निष्पक्षपाती निवडणुका होतील का, याविषयीच आता शंका निर्माण झाली आहे.भाजपने कटकारस्थान रचूनच प. बंगालमध्ये हिंसाचार घडवून आणला आणि निवडणूक आयोग मात्र मोदी यांच्या सभेनंतर प्रचारबंदी करण्याचे आदेश देतो, हा लोकशाहीसाठी धोकादायक प्रकार आहे, अससे बसपच्या नेत्या मायावती म्हणाल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, कोलकात्यात काय घडले, ते प. बंगालमधील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे ती जनता तृणमूल काँग्रेसलाच विजयी करील, अशी खात्री मला आहे.

ममता यांनी मानले आभारया सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या नेत्यांचे आभार मानले आहेत. लोकशाहीवर भाजपतर्फे हल्ला होत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला तसेच प. बंगालमधील जनतेला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानते, असे ममता म्हणाल्या. त्यांनी आज शांतता मिरवणूकही काढली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगwest bengalपश्चिम बंगाल