शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:28 IST

Delhi Election: निवडणूक आयुक्तांनी भाजप उमेदावाराने महिलांबाबत केलेल्या अपमानजक वक्तव्याबाबत इशारा दिला आहे.

Election Commission : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून देशाच्या राजधानीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजप, आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशातच भाजपाचे माजी खासदार आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आहे. रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने केली होती. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.

मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत दिल्ली निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला त्याचा निकाल लागणार असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांना रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रश्नही विचारण्यात आले. निवडणूक आयुक्तांनी प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरील विधानांचा निषेध करत त्या लज्जास्पद असल्याचे म्हटलं.

"महिलांबद्दल कुणी काही चुकीचं बोललं तर त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. अशा घाणेरड्या कमेंट करू नयेत. आम्ही अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आम्ही सध्या आमच्या जिल्हा अधिकाऱ्याला फौजदारी कारवाई करण्यापासून रोखत आहोत. आम्ही फौजदारी कारवाई करू लागलो तर चांगले होणार नाही. याबाबत मतदारांना निर्णय घेऊ द्या. मी इशारा देत आहे. मुलांचा अजिबात वापर करु नका. एकीकडे सबलीकरण होत आहे तर दुसरीकडे महिलांना असे बोलले जात आहे. गरज भासल्यास आम्ही  कारवाई करू," असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं.

भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रोहिणीतील भाजपच्या परिवर्तन रॅलीत बोलताना मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. "आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता," असं रमेश बिधुरी म्हणाले. अतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूचे समर्थन केले होते आणि त्यांनी अफझल गुरूचा बचाव केल्याचा आरोपही बिधुरी यांनी केला.

दरम्यान, त्याआधी रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन, असे वक्तव्य बिधुरींनी केले होते. टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं बिधुरी म्हणाले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगdelhiदिल्लीPriyanka Gandhiप्रियंका गांधी