शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'पॅन'नंतर आता आणखी एक कार्ड 'आधार'ला जोडणार?; देशहितार्थ मोदी सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 11:36 IST

मोदी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली: मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. यासाठी आयोगानं कायदे मंत्रालयाला पत्रदेखील लिहिलं आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. हे पाऊल उचललं गेल्यास बोगस मतदार ओळखपत्रांना चाप बसेल, असा विश्वास आयोगानं व्यक्त केला आहे.  मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी निवडणूक आयोगानं याआधीही सरकारकडे केली होती. मात्र त्यावेळी आधार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. त्यामुळे सरकारनं मतदार ओळखपत्र आणि आधारच्या जोडणीचा विषय टाळला. मात्र आता निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा याबद्दलची मागणी केली आहे. मोदी सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या निर्णयांचा धडाका लावल्यानं या मागणीचा सकारात्मक विचार होईल, अशी आशा निवडणूक आयोगाला वाटते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर भाजपाचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बोगस मतदान रोखण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधार कार्डवर आधारित मतदान प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेतून केली होती. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडल्यानं मूलभूत हक्कांवर गदा येणार नाही, असा दावा उपाध्याय यांनी न्यायालयात केला. या प्रकरणी न्यायालयानं निवडणूक आयोगाला योग्य ते आदेश देण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर न्यायालयानं आयोगाला यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली. न्यायालयानं जुलै महिन्यात हा निकाल दिला होता.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक