शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाला मिळणार दंडात्मक अधिकार, कायद्यात करणार सुधारणा? मोफतची संस्कृती संपविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 05:46 IST

मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली: राजकीय पक्षांनी देऊ केलेल्या मोफतच्या घोषणा आदी बंद करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतल्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मध्ये सुधारणा करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. 

मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्या राजकीय पक्षांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे. निवडणूक सुधारणांबाबत आयोगाच्या इतर प्रस्तावांवर सरकार विचार करण्यास उत्सुक आहे. 

१२ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीत आश्वासन देण्याबाबत जबाबदारी घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला भाजपने विरोध केला होता. तरीही आता त्यांचे मन बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैच्या मध्यात एका रॅलीत मोफतच्या संस्कृतीला विरोध केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, यावर निवडणूक आयोगाने पुढाकार घेण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी याबाबत पाऊल टाकले आणि निवडणूक आयोग, नीती आयोग, वित्त आयोग आणि आरबीआयसारख्या विविध संस्थांना मोफतच्या मुद्द्यावर विचारमंथन करण्यास आणि विधायक सूचना मांडण्यास सांगितले. 

याबाबत निवडणूक आयोगानेही वेबसाइटवर माहिती टाकली की, जाहीरनाम्यातील त्यांच्या आश्वासनांच्या आर्थिक परिणामाबद्दल राजकीय पक्षांनी मतदारांना माहिती द्यावी. निवडणूक आयोगाच्या या पावलानंतर विरोधक संतप्त झाले आणि भाजप वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यावर टीका केली. 

लवकरच सर्वपक्षीय बैठकीची शक्यता

विधायक सूचना देण्याबाबत नीती आयोग आणि इतर संस्थांची मते जाणून घेतल्यानंतर निवडणूक आयोग लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवू शकते. निवडणुकीला जवळपास दोन वर्षे बाकी असताना नवीन आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ हातात आहे. २०१३ मध्ये देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते की, मतदारांना अशीच आश्वासने द्या, ज्यांची पूर्तता करणे शक्य आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCentral Governmentकेंद्र सरकार