शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:29 IST

Election Commission of India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मतदार पुनरावलोकनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाची एका शब्दावरून कोंडी झाल्याचे दिसून आले.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मतदार पुनरावलोकनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आलेल्या या पावलाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. तर काही जणांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाची एका शब्दावरून कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी वरिष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, निवडणूक आयोग जी प्रक्रिया अवलंबत आहे त्याची १९५० सालच्या अधिनियमामध्ये आणि मतदार नोंदणी नियमामध्ये नोंदच नाही आहे. देशाच्या इतिहासात असं पुनरावलोकन पहिल्यांदाच होत आहे.

या प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांचे वकील शंकर नारायणन यांनी सांगितले की, कायद्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि समरी अशा दोन प्रकारचे पुनरावलोकन शक्य आहे. मात्र बिहारमध्ये आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाची नवी प्रक्रिया लागू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ७.९ कोटी लोकांना पुन्हा कागदपत्रं सादर करावी लागतील. तसेच यासाठी केवळ ११ प्रकारची कागदपत्रेच वैध असणार आहेत. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने दिलेल मतदार ओळखपत्रही यामध्ये अमान्य करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर २००३ च्या मतदार यादीत ज्यांची नावं आहे, त्यांनाही एक नवा अर्ज भरावा लागणार आहे. तसं न केल्यास त्यांचं नावही मतदार यादीतून हटवलं जाईल. तर २००३ नंतर यादीमध्ये नाव नोंदवणाऱ्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहे.

शंकरनारायणन पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया केवळ बेकायदेशीरच नाही तर भेदभाव करणारी आहे. यामध्ये न्यायालय, कला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींना कागदपत्रे जमा न करण्याची सवलत देण्यात आली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कठीण प्रक्रियेच्या माध्यमातून आपली ओळख पटवावी लागणार आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धुलिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून जे काही केलं जात आहे ते घटनेच्या चौकटमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाच्या कृतीला बेकायदेशीर ठरवू शकत नाही. त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील शंकर नारायणन यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकारांना आव्हान देत नाही आहोत. तर ही प्रक्रिया ज्या प्रकारे राबवली जात आहे ती नियमांच्या विरुद्ध आहे, असं आमचं म्हणणं आहे.

यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारले की, जर तुम्ही नागरिकत्वाच्या तपासणी प्रक्रियेत सहभागी झालात तर हे एक मोठं आणि व्यापक अभियान होईल. जर नागरिकत्वाचीच तपासणी करायची होती तर ही प्रक्रिया आधी सुरू व्हायला हवी होती. तसेच नागरिकत्वाच्या तपासणीमध्ये कुठल्याही अर्ध-न्यायिक संस्थेला समाविष्ट केलं गेलं तर संपूर्ण प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होईल, असे कोर्टाने सांगितले. तसेच यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही दीर्घकालीन आणि वेळखाऊ होईल, असे मतही कोर्टाने मांडले.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय