शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:29 IST

Election Commission of India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मतदार पुनरावलोकनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाची एका शब्दावरून कोंडी झाल्याचे दिसून आले.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मतदार पुनरावलोकनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आलेल्या या पावलाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. तर काही जणांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाची एका शब्दावरून कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी वरिष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, निवडणूक आयोग जी प्रक्रिया अवलंबत आहे त्याची १९५० सालच्या अधिनियमामध्ये आणि मतदार नोंदणी नियमामध्ये नोंदच नाही आहे. देशाच्या इतिहासात असं पुनरावलोकन पहिल्यांदाच होत आहे.

या प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांचे वकील शंकर नारायणन यांनी सांगितले की, कायद्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि समरी अशा दोन प्रकारचे पुनरावलोकन शक्य आहे. मात्र बिहारमध्ये आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाची नवी प्रक्रिया लागू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ७.९ कोटी लोकांना पुन्हा कागदपत्रं सादर करावी लागतील. तसेच यासाठी केवळ ११ प्रकारची कागदपत्रेच वैध असणार आहेत. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने दिलेल मतदार ओळखपत्रही यामध्ये अमान्य करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर २००३ च्या मतदार यादीत ज्यांची नावं आहे, त्यांनाही एक नवा अर्ज भरावा लागणार आहे. तसं न केल्यास त्यांचं नावही मतदार यादीतून हटवलं जाईल. तर २००३ नंतर यादीमध्ये नाव नोंदवणाऱ्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहे.

शंकरनारायणन पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया केवळ बेकायदेशीरच नाही तर भेदभाव करणारी आहे. यामध्ये न्यायालय, कला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींना कागदपत्रे जमा न करण्याची सवलत देण्यात आली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कठीण प्रक्रियेच्या माध्यमातून आपली ओळख पटवावी लागणार आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धुलिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून जे काही केलं जात आहे ते घटनेच्या चौकटमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाच्या कृतीला बेकायदेशीर ठरवू शकत नाही. त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील शंकर नारायणन यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकारांना आव्हान देत नाही आहोत. तर ही प्रक्रिया ज्या प्रकारे राबवली जात आहे ती नियमांच्या विरुद्ध आहे, असं आमचं म्हणणं आहे.

यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारले की, जर तुम्ही नागरिकत्वाच्या तपासणी प्रक्रियेत सहभागी झालात तर हे एक मोठं आणि व्यापक अभियान होईल. जर नागरिकत्वाचीच तपासणी करायची होती तर ही प्रक्रिया आधी सुरू व्हायला हवी होती. तसेच नागरिकत्वाच्या तपासणीमध्ये कुठल्याही अर्ध-न्यायिक संस्थेला समाविष्ट केलं गेलं तर संपूर्ण प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होईल, असे कोर्टाने सांगितले. तसेच यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही दीर्घकालीन आणि वेळखाऊ होईल, असे मतही कोर्टाने मांडले.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय