शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

CoronaVirus: निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; ११ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 22:16 IST

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णयलोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुका लांबणीवरदेशभरातील ११ मतदारसंघात होणार होत्या पोटनिवडणुका

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. देशाला तिसऱ्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात ११ ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे. (election commission postponed bypoll election of parliamentary and assembly constituencies)

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आयोजनावरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असून, निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आता देशभरात ११ ठिकाणी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. 

भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

कुठे होणार होत्या निवडणुका

येत्या कालावधीत देशभरातील ११ ठिकाणी पोटनिवडणुका होणार होत्या. यामध्ये विधानसभेच्या ८ आणि लोकसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार होत्या. यामध्ये हरियाणाधील काल्का आणि एलेनाबाद, राज्यस्थानमधील वल्लभनगर, कर्नाटकमधील सिंडगी, मेघालमधील राजाबाला आणि मॉरिंगखेंग, हिमाचल प्रदेशमधील फतेहपूर, आंध्र प्रदेशमधील बडवेल या विधानसभा मतदारसंघात, तर दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशमधील खांडवा, हिमाचल प्रदेशमधील मंडी या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार होत्या. मात्र, त्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

Vi च्या ‘या’ प्लानमध्ये बदल; केवळ ७ रुपयांत दररोज १.५ जीबी डेटा

माध्यमांना थांबवू शकत नाही

निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालय जी मते व्यक्त करते, त्यांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चपराक लगावली. न्या. चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयात होणाऱ्या चर्चेच वार्तांकन न करण्यास माध्यमांना सांगू शकत नाही. अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा वकील आणि न्यायाधीशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये माध्यमे पहारेकरी आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 

‘या’ बँकेतील हिस्सा विकण्यास मोदी सरकारची मंजुरी; ५ वर्षांनी झाला होता भरघोस नफा

दरम्यान, पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन होत असताना राजकीय पक्षांना रोखले नाही, यावर मद्रास उच्च न्यायालयाने मोठी नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, या शब्दांत न्यायालयाने फटकारले होते. यानंतर आता आमची प्रतिमा डागाळली, असे सांगत निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग