शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus: निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; ११ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 22:16 IST

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णयलोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुका लांबणीवरदेशभरातील ११ मतदारसंघात होणार होत्या पोटनिवडणुका

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. देशाला तिसऱ्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात ११ ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे. (election commission postponed bypoll election of parliamentary and assembly constituencies)

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आयोजनावरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असून, निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आता देशभरात ११ ठिकाणी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. 

भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

कुठे होणार होत्या निवडणुका

येत्या कालावधीत देशभरातील ११ ठिकाणी पोटनिवडणुका होणार होत्या. यामध्ये विधानसभेच्या ८ आणि लोकसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार होत्या. यामध्ये हरियाणाधील काल्का आणि एलेनाबाद, राज्यस्थानमधील वल्लभनगर, कर्नाटकमधील सिंडगी, मेघालमधील राजाबाला आणि मॉरिंगखेंग, हिमाचल प्रदेशमधील फतेहपूर, आंध्र प्रदेशमधील बडवेल या विधानसभा मतदारसंघात, तर दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशमधील खांडवा, हिमाचल प्रदेशमधील मंडी या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार होत्या. मात्र, त्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

Vi च्या ‘या’ प्लानमध्ये बदल; केवळ ७ रुपयांत दररोज १.५ जीबी डेटा

माध्यमांना थांबवू शकत नाही

निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालय जी मते व्यक्त करते, त्यांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चपराक लगावली. न्या. चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयात होणाऱ्या चर्चेच वार्तांकन न करण्यास माध्यमांना सांगू शकत नाही. अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा वकील आणि न्यायाधीशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये माध्यमे पहारेकरी आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 

‘या’ बँकेतील हिस्सा विकण्यास मोदी सरकारची मंजुरी; ५ वर्षांनी झाला होता भरघोस नफा

दरम्यान, पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन होत असताना राजकीय पक्षांना रोखले नाही, यावर मद्रास उच्च न्यायालयाने मोठी नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, या शब्दांत न्यायालयाने फटकारले होते. यानंतर आता आमची प्रतिमा डागाळली, असे सांगत निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग