शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:55 IST

Karnataka Election Commission: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे पत्रकार परिषदेमधून प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. दरम्यान, या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.

मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना हटवण्याबाबत केलेल्या आरोपांबाबत सहीनिशी शपथपत्र सादर करण्याचे आदेश कर्नाटक निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी हे मतदार यादीतील कोणत्या नावांना बनावट मानतात, त्यांचा पार्ट क्रमांक आणि सिरियल नंबर काय आहेत. तसेच हे दावे ते वैयक्तिक माहितीच्या आधारावर देह आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी दिलेली माहिती खोटी आढळल्यास त्यांच्यावर आरपी अॅक्ट १९५० च्या कलम ३१ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२७ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. 

दरम्यान, महाराष्ट्रात मतांची चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्येही मतांचा घोटाला झाले आहे. कर्नाटकमधील पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये आम्ही १६ जागा जिंकत होतो. मात्र प्रत्यक्षात आम्हाला ९ जागाच मिळाल्या. विशेषकरून बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघामधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख बनावट मतदार जोडले गेले. त्यामुळे भाजपाचा विजय झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

तर महाराष्ट्रातील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याबाबत आरोप करताना राहुल गांधी म्हणाले होते की, राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग