शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:23 IST

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे.

श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन कधीही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यामुळे, राज्य आणि केंद्र सरकारने विकासकामे आणि शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात गेल्या ४८ तासांत ४५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महायुती सरकारने गेल्या ५ दिवसांत तब्बल ७३० पेक्षा जास्त शासन निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विविध राज्यात लाखो कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पहिली महत्वाची घोषणा केली. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह त्यांच्या पथकाने केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमधील निवडणुकीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे. तसेच, निवडणूक आयोग निवडणूक घेण्यसाठी पूर्णत: सक्षम असून पुढील काही दिवसांत लोकसभा तर यंदाच्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत, असेही राजीव कुमार यांनी म्हटले. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, अफगानिस्तान आणि चीनच्या सीमारेषांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, इतर राज्यातील सीमाभागातही मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक पथकाने येथील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. तसेच, राज्य निवडणूक आयुक्तांकडूनही आढावा घेण्यात आला. येथील निवडणुकांसाठी १२,५०० निवडणूक कर्तव्यावरील वाहनांसाठी जीपीएस प्रणाली निर्धारीत करण्यात आली आहे. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असून जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभेच्या ५ जागा आहेत, पण यंदा समीकरण बदलले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये लोकसभेच्या तीन जागा होत्या, तर, जम्मू प्रदेशात २ जागा होत्या. आता, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी २-२ जागा असणार आहेत. तर, राजोरी-अनंतनाग एकत्र करुन नवीन लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. या नवीन जागेवरच राजकीय नेत्यांची नजर आहे. 

लोकसभा निवडणुकांसह येथील विधानसभा निवडणुकाही घेण्यात याव्या, अशी मागणी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांकडून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग