शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:23 IST

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे.

श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन कधीही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यामुळे, राज्य आणि केंद्र सरकारने विकासकामे आणि शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात गेल्या ४८ तासांत ४५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महायुती सरकारने गेल्या ५ दिवसांत तब्बल ७३० पेक्षा जास्त शासन निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विविध राज्यात लाखो कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पहिली महत्वाची घोषणा केली. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह त्यांच्या पथकाने केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमधील निवडणुकीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे. तसेच, निवडणूक आयोग निवडणूक घेण्यसाठी पूर्णत: सक्षम असून पुढील काही दिवसांत लोकसभा तर यंदाच्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत, असेही राजीव कुमार यांनी म्हटले. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, अफगानिस्तान आणि चीनच्या सीमारेषांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, इतर राज्यातील सीमाभागातही मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक पथकाने येथील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. तसेच, राज्य निवडणूक आयुक्तांकडूनही आढावा घेण्यात आला. येथील निवडणुकांसाठी १२,५०० निवडणूक कर्तव्यावरील वाहनांसाठी जीपीएस प्रणाली निर्धारीत करण्यात आली आहे. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असून जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभेच्या ५ जागा आहेत, पण यंदा समीकरण बदलले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये लोकसभेच्या तीन जागा होत्या, तर, जम्मू प्रदेशात २ जागा होत्या. आता, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी २-२ जागा असणार आहेत. तर, राजोरी-अनंतनाग एकत्र करुन नवीन लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. या नवीन जागेवरच राजकीय नेत्यांची नजर आहे. 

लोकसभा निवडणुकांसह येथील विधानसभा निवडणुकाही घेण्यात याव्या, अशी मागणी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांकडून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग