शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:23 IST

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे.

श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन कधीही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यामुळे, राज्य आणि केंद्र सरकारने विकासकामे आणि शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात गेल्या ४८ तासांत ४५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महायुती सरकारने गेल्या ५ दिवसांत तब्बल ७३० पेक्षा जास्त शासन निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विविध राज्यात लाखो कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पहिली महत्वाची घोषणा केली. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह त्यांच्या पथकाने केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमधील निवडणुकीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे. तसेच, निवडणूक आयोग निवडणूक घेण्यसाठी पूर्णत: सक्षम असून पुढील काही दिवसांत लोकसभा तर यंदाच्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत, असेही राजीव कुमार यांनी म्हटले. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, अफगानिस्तान आणि चीनच्या सीमारेषांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, इतर राज्यातील सीमाभागातही मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक पथकाने येथील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. तसेच, राज्य निवडणूक आयुक्तांकडूनही आढावा घेण्यात आला. येथील निवडणुकांसाठी १२,५०० निवडणूक कर्तव्यावरील वाहनांसाठी जीपीएस प्रणाली निर्धारीत करण्यात आली आहे. 

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असून जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभेच्या ५ जागा आहेत, पण यंदा समीकरण बदलले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये लोकसभेच्या तीन जागा होत्या, तर, जम्मू प्रदेशात २ जागा होत्या. आता, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी २-२ जागा असणार आहेत. तर, राजोरी-अनंतनाग एकत्र करुन नवीन लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. या नवीन जागेवरच राजकीय नेत्यांची नजर आहे. 

लोकसभा निवडणुकांसह येथील विधानसभा निवडणुकाही घेण्यात याव्या, अशी मागणी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांकडून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग