शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या य़ा नियमात सरकारकडून मोठा बदल, आता सर्वसामान्यांना मागवता येणार नाही ही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 20:42 IST

Election Commission of India: सरकारने दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसोबत उमेदवारांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केला आहे.

मागच्या काही निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांनी इव्हीएम आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती. विरोधी पक्षामधील नेत्यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. आता या परिस्थितीत सरकारने निवडणुकीच्या संदर्भातील नियमात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसोबत उमेदवारांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीच्या आधारावर केंद्रीय कायदे मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ९३ (२) (ए) मध्ये दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनंतर आता निवडणुकीशी संबंधित असलेले हे सर्व दस्तऐवज सर्वसामान्यांसाठी उपलब्द राहणार नाहीत.

मात्र नियम ९३ मधील तरतुदींनुसार निवडणुकीशी संबंधित इतर सर्व दस्तऐवज सार्वजनिक निरीक्षणासाठी खुले राहतील. संशोधनामध्ये दस्तऐवजांनंतर या नियमांना जोडण्यात आले आहे. हा निर्णय घेण्यामागे एक न्यायालयीन खटला असल्याचे कायदे मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच सर्व दस्तऐवज आणि कागदपत्रे मिळवता येतील. या संदर्भातील नियमामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.  

मतदानामधील गोपनीयतेचं होणारं उल्लंघन तसेच मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आर्टिफिशन इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या संभाव्य दुरुपयोगाला रोखण्यासाठी या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज दिल्याने मतदानाबाबत गोपनीयता आवश्यक असलेल्या जम्मू-काश्मीर आणि नक्षल प्रभावित भागामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच त्यामुळे मतदारांचं जीवित धोक्यात येऊ शकतं. मात्र निवडणुकीबाबतची कागपत्रं आणि दस्तऐवज हे सार्वजनिक निरीक्षणासाठी उपलब्ध असतील.  

निवडणूक आयोगातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीच्या नियमांतर्गत मतदान केंद्रांचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि वेबकास्टिंग केलं जात नाही. तर निवडणूक आयोगाकडून समान संधी सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा परिणाम आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCentral Governmentकेंद्र सरकार