शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निवडणुकीच्या य़ा नियमात सरकारकडून मोठा बदल, आता सर्वसामान्यांना मागवता येणार नाही ही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 20:42 IST

Election Commission of India: सरकारने दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसोबत उमेदवारांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केला आहे.

मागच्या काही निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांनी इव्हीएम आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती. विरोधी पक्षामधील नेत्यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. आता या परिस्थितीत सरकारने निवडणुकीच्या संदर्भातील नियमात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसोबत उमेदवारांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीच्या आधारावर केंद्रीय कायदे मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ९३ (२) (ए) मध्ये दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनंतर आता निवडणुकीशी संबंधित असलेले हे सर्व दस्तऐवज सर्वसामान्यांसाठी उपलब्द राहणार नाहीत.

मात्र नियम ९३ मधील तरतुदींनुसार निवडणुकीशी संबंधित इतर सर्व दस्तऐवज सार्वजनिक निरीक्षणासाठी खुले राहतील. संशोधनामध्ये दस्तऐवजांनंतर या नियमांना जोडण्यात आले आहे. हा निर्णय घेण्यामागे एक न्यायालयीन खटला असल्याचे कायदे मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच सर्व दस्तऐवज आणि कागदपत्रे मिळवता येतील. या संदर्भातील नियमामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.  

मतदानामधील गोपनीयतेचं होणारं उल्लंघन तसेच मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आर्टिफिशन इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या संभाव्य दुरुपयोगाला रोखण्यासाठी या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज दिल्याने मतदानाबाबत गोपनीयता आवश्यक असलेल्या जम्मू-काश्मीर आणि नक्षल प्रभावित भागामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच त्यामुळे मतदारांचं जीवित धोक्यात येऊ शकतं. मात्र निवडणुकीबाबतची कागपत्रं आणि दस्तऐवज हे सार्वजनिक निरीक्षणासाठी उपलब्ध असतील.  

निवडणूक आयोगातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीच्या नियमांतर्गत मतदान केंद्रांचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि वेबकास्टिंग केलं जात नाही. तर निवडणूक आयोगाकडून समान संधी सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा परिणाम आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCentral Governmentकेंद्र सरकार