शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

निवडणूक आयोगाला पुन्हा ताकद गवसली; सरन्यायाधीशांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:14 IST

बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते.

नवी दिल्ली : आक्षेपार्ह टीकांवरून सत्ताधारी भाजपाच्या दोन मोठ्या नेत्यांसह सपा, बसपाच्या नेत्यांवर काही काळासाठी प्रचारबंदीची कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाला त्यांची ताकद पुन्हा गवसल्याचा टोलाही सरन्यायाधीशांनी लगावला आहे. 

बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते. यानंतर आयोगाने सोमवारी सायंकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तास तर मायावातींवर 48 तासांची बंदी आणली होती. तर उशिराने आझम खान यांच्यावर 72 आणि मेनका गांधींवर 48 तासांची प्रचारबंदी आणली होती. 

निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आज समाधान व्यक्त केले. तसेच निवडणूक आयोगाला त्यांची ताकद परत मिळाल्याचे दिसत असल्याने न्यायालयाला अंतरिम आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. न्यायालयामध्ये शारजाहची एक अनिवासी भारतीय योगा टीचर मनसुखानी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. याचिकेमध्ये अशा नेत्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने 8 एप्रिलला निवडणूक आयोगाला याबाबत नोटीस पाठविली होती. 

सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशमध्ये जातीय आणि आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाईबाबत आयोगाला विचारले होते. यावेळी आयोगाने या प्रकरणांमध्ये आम्ही केवळ नोटीसा पाठवून उत्तरे मागू शकतो, असे उत्तर दिले होते. यावर गोगोई यांनी याचा सरळ अर्थ आयोग शक्तीहीन झाला असा लावावा का, असे विचारले होते. यानंतर आयोगाने या चार नेत्यांवर कारवाई केली होती. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने आणलेल्या बंदीविरोधात मायावतींनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावले आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथManeka Gandhiमनेका गांधी