शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:45 IST

काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे.

मागील महिन्यात हरयाणा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर दिले. एक निवेदन जारी करून काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील वेळी निराधार आणि खळबळजनक तक्रारीबाबत आवाहन केले.

बेजबाबदार आरोपांमुळे जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणुकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे टाळण्याचे आवाहन केले. आयोगाने काँग्रेसला  ठोस पावले उचलण्याचे आणि अशा तक्रारींच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे आवाहन केले.

PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

आयोगाने म्हटले आहे की, हरयाणातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा निर्दोष होता आणि तो काँग्रेस उमेदवार किंवा एजंटांच्या देखरेखीखाली पार पडला. २६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल फेरपडताळणी केली. सर्व तक्रारींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काँग्रेसला १६०० पानांचे उत्तर दिले आहे.

हरयाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावल्या. हरयाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममध्ये ९९ टक्के बॅटरीची स्थिती दिसून आल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केल्यानंतर, मशिन्समध्ये संभाव्य छेडछाड झाल्याची तक्रार आणि अधिकाऱ्यांवर मतमोजणीला जाणूनबुजून उशीर केल्याचा होता.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर बहुमत मिळवले आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात सत्ताविरोधी लाटेचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय INLD ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.  त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग