शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:45 IST

काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे.

मागील महिन्यात हरयाणा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर दिले. एक निवेदन जारी करून काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील वेळी निराधार आणि खळबळजनक तक्रारीबाबत आवाहन केले.

बेजबाबदार आरोपांमुळे जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणुकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे टाळण्याचे आवाहन केले. आयोगाने काँग्रेसला  ठोस पावले उचलण्याचे आणि अशा तक्रारींच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे आवाहन केले.

PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

आयोगाने म्हटले आहे की, हरयाणातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा निर्दोष होता आणि तो काँग्रेस उमेदवार किंवा एजंटांच्या देखरेखीखाली पार पडला. २६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल फेरपडताळणी केली. सर्व तक्रारींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काँग्रेसला १६०० पानांचे उत्तर दिले आहे.

हरयाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावल्या. हरयाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममध्ये ९९ टक्के बॅटरीची स्थिती दिसून आल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केल्यानंतर, मशिन्समध्ये संभाव्य छेडछाड झाल्याची तक्रार आणि अधिकाऱ्यांवर मतमोजणीला जाणूनबुजून उशीर केल्याचा होता.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर बहुमत मिळवले आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात सत्ताविरोधी लाटेचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय INLD ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.  त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग